खाऱया पाण्यामुळे शेती नष्ट होण्याच्या मार्गावर
प्रतिनिधी/ पेडणे
ग्रामीण भागातील लोकांनी विशेषतः युवकांनी शेती करावी असा सरकारचा अट्टहास असतो. आत्मनिर्भर भारत हे सरकारचे धोरण आहे मात्र हे धोरण प्रत्यक्षात कृतीत येत नसल्याचा प्रत्यय पराष्टे येथील शेतकऱयांना आला आहे. पराष्टे येथील शेतकऱयांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण न झाल्याने काल या भागातून जाणाऱया तेरेखोल खाडीचे खारे पाणी शेतीत शिरले. खारे पाणी शिरल्याने भविष्यात ही शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
दरम्यान, खारे पाणी शेतात शिरल्याने शेतकरी संकटात आले असून उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी या समस्येकडे लक्ष देऊन त्यावर मात करण्यासाठी सरकार दरबारी उपाययोजना आखावी, अशी मागणी तेथील शेतकऱयांनी केली आहे. पराष्टे येथे पारंपरिक वायंगणी शेतात बंधारा फुटून तेरेखोल खाडीचे खारे पाणी आत घुसल्याने शेतीची नासाडी झाली आहे. उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी तेथील बंधाऱयाच्या कामात तातडीने लक्ष घालून त्याचा पाठपुरावा करावा बंधाऱयाचे बांधकाम व शेतीच्या बांधाचे काम तात्काळ करावे, अशी मागणी शेतकऱयांसह पेडणे नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष दीपक मांदेकर यांनी केली आहे. गेल्या अनेक पिढय़ा येथील शेतमळय़ात पावसाळी तसेच वायगणी शेती पिकवतात. या व्यतिरिक्त मिरची लागवड, अळसाणे ही पिके घेतली जातात मात्र नदीचे पाणी आत घुसल्याने जमिनीची नुकसानी झाली आहे.
मेघश्याम हरमलकर, सुशांत मांदेकर, रामनाथ हरमलकर, अनंत मांदेकर, गजानन हरमलकर, एकनाथ हरमलकर, अरुण मांदेकर, गोपाळ मांदेकर, भरत हरमलकर, प्रशांत डेगवेकर, दिनानाथ निगळये, नंदू ताटकर, रमेश हरमलकर, शंकर हरमलकर, कृष्णा हरमलकर, आपा हरमलकर, एंथनी डिसोजा आदी शेतकऱयांनी या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री आजगावकर यांच्याकडे केली आहे.
शेतकऱयांनी एकत्र येऊन बंधारा बांधावा यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले होते पण त्याची कारवाई झाली नाही. त्यामुळे शेतकऱयांच्या शेतीचे येणाऱया काळात पाणी भरून मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्मयता आहे. संबंधित खात्याने आणि उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी तातडीने यात विशेष लक्ष घालून बंधारा बांधून द्यावा, अशी मागणी होत आहे.
तेरेखोल नदीत मोठय़ा प्रमाणात रेती उसपा करण्यात येत असल्याने या भागाचा संपूर्ण कठडा तसेच माड वाहून गेले आहेत. भरतीच्या वेळी मातीचा बांध फुटल्याने त्याला भेगा पडून नदीचे खारे पाणी शेतमळय़ात घुसते त्यामुळे यंदा वायंगणी शेती नष्ट होण्याची शक्यता आहे.