परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी : सोशल मीडियावर संदेश व्हायरल
प्रतिनिधी / बेळगाव
‘परीक्षा घ्याव्यात की न घ्याव्यात’, सर्व महाविद्यालयांची अवस्था सध्या हॅम्लेटप्रमाणे झाली आहे. ‘टू बी ऑर नॉट टू बी’ हा हॅम्लेटला जसा प्रश्न पडला, तसा महाविद्यालयांना व विद्यापीठांना पडला आहे. दरम्यान विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची वेगळी आणि स्वतंत्र व्यवस्था करा, अशी सूचना केली आहे. तथापि विद्यार्थी मात्र परीक्षाच पुढे ढकलावी, या मागणीशी ठाम असून सोशल मीडियावरून त्यांनी संदेश देण्यास सुरुवात केली आहे.
मंगळवारी विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी ऑनलाईन मीटिंगद्वारे संपर्क साधला आणि कोरोनाकाळात गतवषी जशी परीक्षा घेतली त्याचीच पुनरावृत्ती करा, असे सांगितले आहे. गतवषी कोविड काळातही खास मार्गदर्शक प्रणालीचा अवलंब करून परीक्षा घेतल्या होत्या. याअंतर्गत कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांसाठी वेगळा कक्ष द्यावा, पर्यवेक्षकांना पीपीई किट देण्यात यावेत, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचे गठ्ठे सर्व खबरदारी घेऊन हाताळावेत व 48 तासांनंतर कलेक्शन सेंटरवर पाठवावेत, अशी सूचना देण्यात आली आहे.
मात्र सीबीएसईने दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्याप्रमाणे विद्यापीठानेसुद्धा परीक्षा पुढे ढकलाव्यात, बेंगळूरसह सर्व जिल्हय़ांमध्ये कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. तसेच सध्या परिवहन कर्मचाऱयांचा संप सुरू आहे. त्यामुळे परीक्षा सुरळीतपणे पार पडतील, याबद्दल साशंकता आहे, असे विद्यार्थी म्हणत आहेत.
व्हीटीयूच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरून परीक्षांबाबत जोरदार मते व्यक्त केली आहेत. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा फक्त सहा महिन्यांचा अभ्यासक्रम त्यांनी तीन महिन्यांत पूर्ण केला. इंटरनल्स आणि असाईनमेंट्स पूर्ण केल्या. त्यानंतर त्यांना आपल्या गावी परतण्यास सांगण्यात आले. परीक्षा घ्यायच्याच होत्या तर त्यांना पाठविण्यात काय अर्थ होता? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला आहे.
परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी?
कोरोनाच्या दुसऱया आणि तीव्र लाटेमध्ये परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी? कारण कॉलेजमध्ये सामाजिक अंतराचा नियम पाळणे हा फक्त विनोद होईल. आम्ही बसने ये-जा करतो आणि घरी जाईपर्यंत मला संसर्ग होणारच नाही, अशी खात्री कोण देणार? शिवाय माझ्या घरी आजी-आजोबा आहेत, असे एका विद्याथ्याने म्हटले
आहे.
परीक्षा पुढे ढकलणेच योग्य होईल…
कोरोनाग्रस्तांचा आकडा भीतीदायक आहे. आम्ही अन्य राज्यामध्ये राहतो. शिक्षणासाठी मी बेंगळूरला आले आहे. पण कॉलेज परीक्षेसाठी परवानगी असल्याची लेखी हमी पालकांकडून मागत आहेत. त्यामुळे आम्ही अडचणीत आहोत, असेही विद्यार्थ्यांनी नमूद केले आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि केरळ येथील विद्यार्थी बेंगळूरला परतले आहेत. अभ्यासक्रमही पूर्ण झाला आहे. परंतु पीजी (पेईंग गेस्ट) व हॉस्टेलमधील सुरक्षिततेबाबत विचारून आम्ही त्यांना परत पाठविले आहे. त्यांना परत बोलावणे अशक्मय आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलणे योग्य होईल, असे कर्नाटक कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे के. एच. अनिलकुमार यांनी स्पष्ट केले आहे.