ऑनलाईन टीम / पुणे :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यातील 27 मोठे उद्योग पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
लॉकडाऊन काळात रुतलेल्या अर्थचक्राचा गाडा हाकण्यासाठी राज्यातील मर्यादित उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळातील सर्व नियम आणि अटी पाळून काम सुरु करण्यास या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. या 27 उद्योगांमार्फत 900 कर्मचाऱ्यांना पुन्हा रोजगार उपलब्ध झाला आहे. या कामगारांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था एकाच ठिकाणी करण्यात आली आहे.
यापूर्वी या पाच जिल्ह्यातील अन्न आणि औषध प्रक्रिया करणारे 1450 उद्योग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये 53 हजार कामगार काम करत आहेत.