84 दिवसानंतर पुन्हा नव्याने डोस नाही : लसीकरण अधिकारी फारुक देसाई
कोरोना / सुधाकर काशीद
कोल्हापूर प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस होता. तो नंतर 45 दिवसांनी व त्यानंतर आता चौऱयाऐंशी दिवसापर्यंत ही चालू लागला. आता पहिला डोस घेऊन अनेकांचे 84 दिवस उलटले आहेत. मग त्यांनी आता काय करायचे? तर, त्याचे उत्तरही आता मिळाले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर आता दुसरा डोस 112 दिवसापर्यंत घेतला तरी चालतो. असे जिल्हा लसीकरण अधिकारी फारूक देसाई यांनी बुधवारी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण होईपर्यंत दुसरा डोस घेतला नाही तर पुन्हा नव्याने पहिला व त्यानंतर दुसरा डोस घ्यावा लागेल, या म्हणण्याला अजूनही कोणताही वैद्यकीय आधार मिळालेला नाही. त्यामुळे लोकांनी गोंधळून जाण्याची गरज नाही. 112 दिवसात दुसरा डोस सर्वांना मिळेल अशा पद्धतीचे नियोजन सुरू आहे व ते नियोजन लस पुरवण्यानंतर व्यवस्थित होऊ शकेल.
पहिल्या डोसचे प्रमाण कोल्हापूर जिह्यात चांगले आहे. किंबहुना मार्च, एप्रिल, मे मध्ये कोल्हापूर जिल्हा लसीकरणात राज्यात अव्वल होता. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्यांची संख्या जिह्यात मोठी आहे. त्या सर्वांना निश्चितपणे दुसऱया लसीची प्रतीक्षा आहे. अर्थात लस भरपूर प्रमाणात शिल्लक आहे. व ती दिली जात नाही असे अजिबात घडलेले नाही. लस जशी उपलब्ध होईल तशी दिली जात आहे. ही लस ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांना प्राधान्याने दिली जात आहे. मात्र घेणाऱ्यांची संख्या जास्त संख्या कमी यामुळे काही अडचणी येत आहेत.
याच दरम्यान पहिला डोस घेऊन 84 दिवस उलटेपर्यंत दुसरा डोस घेतला नाही तर पुन्हा नव्याने पहिला डोस या चर्चेला कोणत्याही वैद्यकीय आधार नाही असे फारूक देसाई यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, खाजगी वैद्यकीय संस्था लस दिली जात आहे, पण त्याला शुल्क आहे. सरकारी यंत्रणेद्वारे दिली जाणारी लस मोफत आहे. त्यामुळे लोकांची गर्दी होत आहे. येशील असल्याने त्यांना परत जावे लागते. पण ही परिस्थिती नक्की बदलेल.
18 वर्षावरील व्यक्तींना मोफत लस देण्याचे या क्षणी तरी कोणतेही नियोजन असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, पंचेचाळीस वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोस देण्याची प्रक्रिया आवाक्यात आल्या नंतरच 18 वर्षावरील लोकांना लस देण्यास सुरवात करावी लागेल. – फारुख देसाईजिल्हा लसीकरण अधिकारी.
अमुकच लस पाहिजे हा देखील लोकांचा आग्रह आहे. अनेक जण आपापल्या डॉक्टरांना विचारून कोणती लस घ्यायची हे ठरवत आहेत. त्यामुळे विशिष्ट लसीसाठी लोकांची जास्त मागणी आहे. त्यामुळे ही लसीकरण आतील सुसूत्रता विस्कळीत झाली आहे.