प्रतिनिधी/ बेळगाव :
लॉकडाऊनमुळे गेल्या 48 दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बाजारपेठ बंद करण्यात आली होती. मात्र आता जिल्हा प्रशासनाने गेल्या आठ दिवसांपासून खुली करण्यास परवानगी दिली आहे. मात्र पांगुळ गल्ली येथील व्यवसायिकांना अजूनही सुरु करण्यास मुभा देण्यात आली नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असून तातडीने आम्हालाही मुभा द्यावी, अशी मागणी पांगुळ गल्ली येथील जागृती व्यापारी असोसिएशनने निवेदनव्दारे केली आहे.
पांगुळ गल्लीमध्ये कपडे, स्टेशनरी, प्लास्टीक यासह इतर जीवनावश्यक वस्तु होलसेल दरात मिळत असतात. त्यामुळे ग्राहकांचा ओढा अधिक असतो. किरकोळ दुकानदारही तेथूनच होलसेलमध्ये साहित्य खरेदी करतात. तेंव्हा आम्हालाही व्यवसाय करण्यास तातडीने मुभा द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रोहीत रावळ, संदीप जैन, संदीप बसरीकट्टी, अमरलाल खटल, दिलीप जैन, महेश पोरवाल, प्रेमजी महषी यांच्यासह व्यापार उपस्थित होते.