ऑनलाईन टीम / श्रीनगर :
पाकिस्तानी सैन्याने केरन, उरी आणि नौगाम सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत पाकचे 7 ते 8 सैनिक ठार केले. या कारवाईत भारताचे 3 जवान शहीद झाले. तर 3 नागरिकांचाही मृत्यू झाला.
केरन, उरी आणि नौगाम सेक्टरमध्ये नागरी वस्ती असलेल्या ठिकाणांना टार्गेट करत पाक सैन्याने आज जोरदार गोळीबार केला. भारतीय सैन्यांने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने पाकचे 7 ते 8 सैनिक ठार करत त्यांचे बंकर्स आणि लाँच पॅड्सही उध्वस्त केले.
दरम्यान, केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा पाक सैन्याचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर कुपवाडातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.