आजपासून पाणीपुरवठय़ात व्यत्यय : हंगामी कामगारांना सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
मागील सहा महिन्यांपासून पाणीपुरवठय़ात सातत्याने व्यत्यय निर्माण होत असल्याने पाणीपुरवठा नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. एलऍडटी कंपनीकडे हस्तांतर करण्यात आलेल्या हंगामी कामगारांना सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्याच्या मागणीसाठी सोमवार दि. 10 पासून आंदोलन छेडणार आहेत. परिणामी सोमवारपासून शहराच्या पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण होणार आहे. त्यामुळे शहरवासियांना आता पुन्हा पाणी समस्येचा सामना करावा लागणार आहे.
जलवाहिनीची दुरुस्ती, वीजपुरवठा कपात तसेच विविध अडचणींमुळे शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा केला जात नाही. अशातच आता हंगामी कामगार आंदोलन छेडणार असल्याने शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्मयता आहे. 24 तास पाणी योजना राबविण्यासाठी पाणीपुरवठा मंडळाकडील कारभार जुलै महिन्यापासून एलऍण्डटी कंपनीकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाकडे हंगामी तत्त्वावर काम करणारे कामगार, व्हॉल्व्हमॅन, सुपरवायझर, पंप ऑपरेटर आणि हेल्परना एलऍण्डटी कंपनीकडे हस्तांतर करण्यात आले होते. पण वेळेवर वेतन मिळत नाही. काही कामगारांना एलऍण्डटीकडे कामावर घेण्यात आले नाही, तसेच पगार कापण्यात येत असल्याची तक्रार करून हंगामी कामगारांनी आंदोलन छेडले होते. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा 3 दिवस ठप्प झाला होता. त्यानंतर सेवेत कायमस्वरुपी करावे, अशा मागणीसाठी पाणीपुरवठा विभागाच्या हंगामी कामगारांनी काम बंद आंदोलन छेडले होते. महापालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेऊन पाणीपुरवठा सुरळीत सुरू केला होता.
वेळेत पगार देणे व कार्यालयीन कामकाजासंबंधित मागण्यांची पूर्तता एलऍण्डटीकडून पूर्ण करण्यात आली. मात्र हंगामी कामगारांना सेवेत कायम करावे या मागणीची पूर्तता झाली नाही. त्यामुळे हंगामी कामगार पुन्हा आंदोलनावर जाणार आहेत. सोमवारपासून आंदोलन छेडणार असल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्मयता आहे. शहरातील पाणीपुरवठा नियोजनावर परिणाम होण्याची शक्मयता असून, शहरवासियांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
शहरवासियांना सहकार्य करण्याचे आवाहन
कामगारांनी आंदोलन छेडल्यानंतर शहरवासियांना पाणीपुरवठा करणे अशक्मय आहे. 350 कामगारांची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पर्याय नसल्याने पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. सोमवार दि. 10 पासून आंदोलन छेडण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा करता येणे शक्मय नाही. त्यामुळे शहरवासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन एलऍण्डटी कंपनीने पत्रकाद्वारे कळविले आहे.