पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आंदोलन घेतले मागे : व्हॉल्वमन, कामगार रूजू : बिलकलेक्टरना सोमवारपर्यंत ब्रेक
प्रतिनिधी /बेळगाव
सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी पाणीपुरवठय़ाच्या हंगामी कामगांरानी गेल्या आठ दिवसांपासून संप पुकारला होता. त्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जनतेचे हाल होत असल्याने हंगामी कामगारांनी संप मागे घेण्याची तयारी दर्शविली होती. पण जिल्हाधिकाऱयांनी परवानगी दिली नसल्याने कामगारांना प्रतीक्षा करावी लागली. मात्र क्हॉल्वमन आणि कामगारांना रूजू होवून काम करण्यास जिल्हाधिकाऱयांनी परवानगी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
सेवेत कायम करण्याची मागणी
गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून महापालिकेकडे पाणीपुरवठय़ाचे काम करणाऱया कामगारांना अद्यापही सेवेत कायम करण्यात आलेले नाही. सेवेत कायम करावे याकरिता प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला होता. पण याबाबत प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे हंगामी कामगारांनी ऑक्टोबरमध्ये महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. पण कामगारांना सेवेत सामील करून घेण्याच्यादृष्टीने प्रशासनाने कोणत्याच हालचाली चालविल्या नाहीत. त्यामुळे हंगामी कामगारांनी सोमवार दि. 10 पासून काम बंद आंदोलन छेडून पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. यामुळे महापालिका आणि एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांची झोप उडाली आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी हंगामी कामगार संघनेच्या पदाधिकाऱयांची आणि महापालिकेच्या अधिकाऱयांची बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. पण तोडगा निघाला नसल्याने कामगांरानी आंदोलन सुरूच ठेवले.
पण सध्या पाण्याअभावी शहरवासियांचे हाल होत असल्याने नागरिक व्हॉल्वमन आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱयांना संपर्क साधून पाणीपुरवठा सुरू करण्याची विनंती करीत आहेत. त्यामुळे नागरिकांचे होणारे हाल थांबविण्यासाठी पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्यादृष्टीने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय हंगामी कामगारांनी घेतला आहे.
तसेच याबाबत जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. पण कामगारांच्या वेतनात वाढ करावी तसेच सेवेत कायम करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मात्र याबाबत जिल्हाधिकाऱयांनी कोणताच निर्णय घेतला नाही. महापालिका आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे सांगून जिल्हाधिकाऱयांनी निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे हंगामी कामगारांनी सोमवारी सायंकाळी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली असता, जिल्हाधिकाऱयांना विनंती करून परवानगी घेतल्यानंतर कामावर घेऊ असे महापालिका आयुक्त रूदेश घाळी यांनी सागितले. त्यामुळे मंगळवारी सकाळी कामगारांनी जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शविली असता, केवळ व्हॉल्वमन आणि कामगारांना रूजू होण्याची परवानगी जिल्हाधिकाऱयांनी दिली. तर बिल कलेक्टर आणि अन्य विभागातील कामगारांना सोमवारनंतर रूजू होण्याची सूचना केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी आंदोलन मागे घेण्याची घोषणा करून व्हॉल्वमन कामावर रूजू झाले आहेत. त्यामुळे आता लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्मयता आहे.