पायाभूत सुविधा उपलब्ध करून दर्जा वाढविणार
प्रतिनिधी/ बेळगाव
पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पाच सरकारी शाळा दत्तक घेतल्या आहेत. सरकारी शाळेत शिकणाऱया विद्यार्थ्यांनाही उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने सरकारी शाळांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारी शाळांना पायाभूत सुविधा पुरविणे कठीण झाले आहे. गेले वर्षभर शाळा उघडल्या नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी व वेगवेगळय़ा संस्थांनी सरकारी शाळा दत्तक घेऊन त्यांची सुधारणा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत रमेश जारकीहोळी यांनी गोकाक तालुक्मयातील पाच सरकारी शाळा दत्तक घेतल्या आहेत.
खासगी शाळांप्रमाणेच सरकारी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढायचा असेल तर या शाळांनाही पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी सरकारी शाळांचा विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी संकल्पना मुख्यमंत्र्यांनी मांडली होती. याला प्रतिसाद देत रमेश जारकीहोळी यांनी ग्रामीण भागातील पाच शाळा दत्तक घेतल्या आहेत.
गोकाक तालुक्मयातील खनगाव, ममदापूर, अंकलगी, धुपदाळ व सुलधाळ येथील सरकारी मुला-मुलींची शाळा दत्तक घेऊन त्या विकसित करण्यासाठी त्यांनी काम सुरू केले आहे. राज्यात 43 हजार 447 सरकारी प्राथमिक शाळा आहेत. तर 3 हजार 29 हायस्कूल आहेत. शिक्षण खात्यासाठी दिल्या जाणाऱया अनुदानातील 90 टक्के वाटा शिक्षकांच्या भत्त्यासाठी खर्च होतो. 10 टक्के अनुदानात शाळांना सुविधा पुरविणे अशक्मय आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, वेगवेगळय़ा संघटना, दानशूरांच्या पुढाकारातून शाळा सुधारणा योजना हाती घेण्यात आली आहे.
शिक्षण खात्याने रमेश जारकीहोळी यांना प्रमाणपत्रही दिले आहे. या पाचही शाळांच्या विकासासाठी पालकमंत्र्यांनी क्रिया योजना बनविली असून विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शाळांचे नूतनीकरण, क्रीडांगण, संरक्षक भिंतीची उभारणी, उद्यान, बाक, संगणक शिक्षण, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य पुरविण्यात येणार असून ग्रामीण भागातील गरीब, अल्पसंख्य, अनुसूचित जाती-जमातीतील मुलांना दत्तक घेऊन त्यांना शिक्षण देण्याची योजनाही हाती घेण्यात आली आहे.
उत्तम शिक्षणामुळे उत्तम समाज निर्मिती करणे शक्मय आहे, या तत्त्वावर आपला विश्वास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून सरकारी शाळा दत्तक घेतल्या आहेत. कोणत्याही आधुनिक शाळांपेक्षाही अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली.