अन्यथा चिरेखाणी बंद करून दंड वसूल करा, पिसुर्ले पंचायतीकडून चिरेखाणी विरोधात तक्रार
प्रतिनिधी / वाळपई
गेले अनेक दिवस सत्तरी तालुक्मयातील पिसुर्ले ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये बेकायदेशीर चिरेखाणीच्या बाबतीत नागरिक आवाज उठवत होते. आता याची गंभीर दखल घेऊन येणाऱया पावसाळय़ात रिकामा खंदकाच्या माध्यमातून निर्माण होणारा धोका त्याच्या पार्श्वभूमीवर पंचायत मंडळाने या चिरेखाणीवर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र सत्तरी तालुक्मयातील उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर, मामलेदार दशरथ गावस वाळपई पोलीस स्थानक व खाण संचालनालयाच्या अधिकाऱयांना सादर केलेले आहे. यामुळे आता सदर चिरेखाणीच्या बाबतीत गेल्या काही दिवसापासून होणारा निष्काळजीपणा याबाबत सरकारची यंत्रणा खरोखरच कारवाई करते का हे पहावे लागणार आहे.
याबाबतची माहिती अशी की पंचायत क्षेत्रातील लोकवस्ती नजीक जवळपास 15 पेक्षा जास्त बेकायदेशीर चिरेखाणी व्यवसाय सुरू आहे. सदर व्यवसाय रात्रंदिवस सुरू असताना सुद्धा संबंधित खात्याची यंत्रणा कारवाई करीत नाही. यामुळे त्याचा स्थानिकांना बऱयाच प्रमाणात त्रास सहन करावा लागत असतो. रात्री अपरात्री चिरेखाणीवर चालणाऱया कर्कश आवाजाच्या मशीन यामुळे लोकांची निद्रानाश होते. यामुळे सदर चिरेखाणीवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी यापूर्वी नागरिकांनी लावून धरली होती. मात्र अजून पर्यंत सदर चिरेखाणी बंद झालेल्या नाहीत .येणाऱया काही दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. यामुळे पावसाचे पाणी या खंदकामध्ये तुडुंब भरून धोका निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. कारण सदरची चिरेखाणीचा व्यवसाय हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्याचप्रमाणे पावसाळी मोसमात या खंदकाच्या भोवती कोणत्या प्रकारची संरक्षक कुंपण नसल्यामुळे गुरांना व नागरिकांना अत्यंत धोका निर्माण होत असतो. यापूर्वी अनेकवेळा गुरे पडून दगावण्याचे प्रकार घडलेले आहेत. याची दखल घेऊन पिसुर्ले पंचायत मंडळाने यासंदर्भाची तक्रार संबंधित खात्याच्या यंत्रणेला दिलेली आहे. त्याचप्रमाणे सदर चिरेखाणीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे .येणाऱया पावसाळी मोसमात यदाकदाचित गुरे व नागरिकांसमोर धोका निर्माण झाल्यास त्याला सरकारची संबंधित यंत्रणा जबाबदार राहणार असल्याचा इशारा या तक्रारीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
सरकारी मालकीच्या जमीनीवर चिरेखाणी.
दरम्यान याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सरकारी मालकीच्या जमिनीमध्ये हा बेकायदेशीर व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहे. मात्र पोलिस ,मामलेदार ,उपजिल्हाधिकारी यंत्रणा याकडे अजिबात कारवाई करीत नाही. याबाबत त्यांच्या एकूण भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. अनेकवेळा या संदर्भाच्या तक्रारी स्थानिकानी संबंधित यंत्रणेकडे केल्या. मात्र त्याची अजिबात दखल अजून पर्यंत घेतलेले नाही. या भागातील सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब यांनी सदरची चिरेखाणीचा व्यवसाय कायदेशीर कराव्यात अन्यथा त्या बंद कराव्यात अशा प्रकारची मागणी करून आतापर्यंत ज्या पद्धतीने बेकायदेशीर व्यवसाय करण्यात आलेला आहे त्याची दंड वसुली सरकारने करून घ्यावी अशा प्रकारची मागणी हनुमंत परब यांनी केली होती. दरम्यान आता पंचायत मंडळाने यासंदर्भात दाखल केलेली तक्रार त्याच्या पार्श्वभूमीवर सरकारची यंत्रणा खरोखरच जागी आहे का हे पहावे लागणार आहे.
दरम्यान काही पंच सभासदांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की दररोज सुरू असलेल्या बेकायदेशीर चिरेखाणीच्या वाहतुकीचे ट्रक होंडा पोलीस चौकी समोरून जात असतात .सदर प्रकार हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे असे असताना सुद्धा त्यांच्यावर अजून पर्यंत कारवाई का करण्यात आली नाही अशा प्रकारचा सवाल पंच सभासदांनी केलेले आहे .यामुळे पोलीस खाते व बेकायदेशीर व्यवसाय करणाऱयामध्ये गुप्त समझोता असल्याची शक्मयता व्यक्त करण्यात आलेली आहे. दरम्यान येणाऱया काळात पावसाळी मोसमात धोका निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी सरकारवर राहणार असल्याचा इशारा पंचायतीने दिलेला आहे.