प्रतिनिधी / सांगली
पुणे मिरज लोंढा या बहुचर्चित रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. येत्या काही महिन्यातच हे काम पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुणे मुंबई आणि गुजरातसह उत्तर भारताकडे जाणाऱ्या सांगली कोल्हापूर भागातील रेल्वे प्रवाशांच्या वेळेत आणि पैशांमध्ये मोठी बचत होणार आहे.
विजेवरीलवरील इंजिनामुळे गाड्यांचा वेग वाढणार आहे. रेल्वे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण यामुळे कोल्हापूर, हुबळी, बेळगाव, बेंगळूर आणि सोलापूर या भागातून मिरज मार्गे पुणे मुंबईकडे जाण्यासाठी नव्या गाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.