विरुचा राजकारणातील प्रवेश बेतेल का त्याच्या जीवावर? प्रियांका बनवू शकेल का राजवीरला गावचा कारभारी? राजकारणावर बेतलेली कारभारी लयभारी मालिकेने सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केली होती. ‘डोळय़ात जाळ हाय, दुश्मनाचा काळ हाय काळीज कापतंय नजरेची सूरी, आला आला कारभारी लयभारी…!’ हे गाणं विशेष गाजलं. या मालिकेच्या निमित्ताने ‘अनुष्का सरकटे’ आणि ‘निखिल चव्हाण’ ही प्रेश जोडी प्रेक्षकांसमोर आली. या मालिकेचं कथा तेजपाल वाघ यांची असून ‘देवमाणूस’ ह्या मालिकेचे संवाद लेखक विशाल कदम यांनी या मालिकेचे देखील संवाद लिहिले आहेत तर पटकथा स्वप्नील गांगुर्डे याची आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींवर आलेले निर्बंध, यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी, यामुळे ‘कारभारी लयभारी’ मालिकेने विराम घेतला होता.
पण आता ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.काकी वीरु आणि त्याच्या आईला ज्या पद्धतीने वागवते ते पाहून पियू ठरवते की या घरात दोघांना त्यांचा मान
म़िळवून द्यायचा. राजवीरचे
वडील राजकारणात आणि विरोधकांसमोर एक दरारा होता. त्याच प्रमाणे राजवीरने सुद्धा पण
सक्रियराजकारणातला राजवीरचा हा प्रवेश त्याच्या जीवावर तर बेतणार नाही ना?