शिरोळ/प्रतिनिधी
ऑगस्ट महिन्यात झालेल्या महापूर व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीनशे कोटी प्राप्त झाली असून आणखीन शंभर कोटी रुपये येत्या पंधरा दिवसात येणार असून ही मदत शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, गृहमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीबाबत विचारले असता मंत्री पाटील म्हणाले, नामदार हसन मुश्रीफ यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता ना हसन मुश्रीफ यांचा अध्याप निरोप आलेला नाही तो कधी येतो याची मी प्रतीक्षा करीत आहे असे सांगून त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.
कैलासवासी अप्पासाहेब सारे पाटील यांनी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम या तालुक्यात केले आहे. त्यांचे पुत्र गणपतराव पाटील यांनी त्यांचा वारसा पुढे चालून तालुक्यातील बहुसंख्या ग्रामपंचायत पंचायत समिती याठिकाणी काँग्रेसची सत्ता हस्तगत केली आहे. गणपतराव पाटील यांना नक्कीच त्यांच्या कामाची दखल घेतली आहे. माझ्या कोट्यातून जी पद माझ्या वाट्याला येतील त्यातील पहिला मान गणपतराव पाटील यांना देणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
सतेज पाटील यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मंत्री झाल्यानंतर प्रथमच भेट दिली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी यांचे शाल गुच्छ देऊन स्वागत केले यावेळी गणपतराव पाटील यांनी तालुक्यातील विविध प्रश्नावर चर्चा केली.
यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे, अमर निकम, महेंद्र बागी, पंचायत समितीच्या सभापती मीनाज जमादार, तात्यासाहेब पाटील कारखान्याचे कार्यकारी संचालक एमिली पाटील, सचिव बी बी शिंदे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.