प्रतिनिधी/ पणजी
पेट्रोल आणि डिझेलच्या प्रचंड वाढलेल्या दरवाढी विरोधात आंदोलन चालवलेल्या काँग्रेसने काल राजधानी पणजीत जोरदार आंदोलन केले. युवक काँग्रेसच्या कार्यकत्यांसह काँग्रेसच्या युवा नेतनेही या आांदोलनात भाग घेतला. चारचाकी वाहन ढकलत नेवून पेट्रोल दरवाढीचा यावेळी तिव्र शब्दात निषेद केला. काँग्रेस हाऊज समोर आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधत तिव्र शब्दात टीका करण्यात आली. महागाईचा आगडोंब उसळला असताना सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ करुन महागाईला खतपाणी घलत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
महागाईच्या विरोधात जोरदार निदर्शने करत अबकी बार मोदी सरकारचा नारा लावला जात होता मात्र सत्येवर येताच भाजपने आपली खरी रणनिती दाखविली. सर्वसामान्य जनतेला समस्यांच्या गर्तेत लोटून सरकार राजकारणात पूर्णपणे व्यस्त आहेत. अर्थव्यावस्था कोलमोडली आहे. बेकारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कामगारवर्ग अर्ध्या पगारात काम करीत आहेत. आधिच जनता जर्जर झाली आहे. आणि अशा स्थितीत सरकारनेही जनतेवर अत्याचार चालविले आहे अशा शब्दात सरकारचा निषेध कलरण्यात आला.
कोरानामुळे सध्या गोमंतकीय वाईट दिवसांना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना पगार नाही, अर्धा पगार, तसेच अनेकांना कामावरुन काढले असताना सरकार पेट्रोल डिझलचे दर वाढवून आणखी लोकांना संकटात टाकत आहे. लोकांना सतावण्याचा हा प्रकार आहे. असे युवा काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी सांगितले..
सध्या अनेकांची आर्थिक परीस्थिती बिकट झाली आहे. अशावेळी हे दर लोकांना कसे परवडणार आहे? असा सवाल म्हार्दोळकर यांनी उपस्थित केला. तसेच या दरवाढी नंतर याचा परीणाम, बस सेवा, व इतर जिवनावश्यक वस्तुंवर होणार आहे. यामुळे दर कमी करावे असे आम्ही राज्यपालामार्फंत राष्ट्रपतींना निवेदन देणार आहोत. असे म्हार्दोळकर यांनी यावेळी सांगितले.
स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांनी जनतेला आश्वासन दिले होते की पेट्रोलचे दर 60 रुपयेपेक्षा अधिक होणार नाही. आता भाजप सरकारने हे आश्वासन पाळण्याची गरज आहे. दरवाढी सत्यताने होत असल्याने लोकांनी जगावे कसे? एकेकाळी ‘बहोत हुई महागाई की वार, अबकी बार मोदी सरकार’ असे म्हणणारे सध्या हेच करत आहे आणि लोकांना संकटात टाकत आहे. भाजप सरकारने आतापर्यंत लोकांची फसवणूक करत आहे. लोकांना लुटण्याचे काम हे सरकार करत आहे. ते त्यांनी बंद करुन पेट्रोल व डिझलचे दर कमी करावे. अशी मागणी गोवा काँग्रेस पक्षाचे सरचिणीस अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.
या निर्षेर्धात रॅलीला युवा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर, सरचिटणीस ऍड. अर्चित नाईक, उबेद खान, विवेक डिसील्वा, उर्फान मुल्ला, साईश आरोलकर, ग्लेन काब्राल, अमरनाथ पणजीकर, जर्नादन भंडारी व इतर सदस्य उपस्थित होते.