शेतांना संभाव्य धोका व प्रदुषणाची चाचणी केली जाणार : पावसाळय़ापूर्वी धोकादायक स्थिती सुधारावी.
डिचोली / प्रतिनिधी
पैरा मये येथील सध्या ई लिलावाच्या नावाखाली खनिज मालाचा साठा खाली करण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मातीची कडा येत्या पावसाळय़ात कोसळून मयेतील शेतांमध्ये खनिजमिश्रीत माती येण्याची शक्मयता असल्याने सदर खाण पीठाची खाण संबंधित अधिकारी व भुगर्भशास्त्रज्ञ यांच्यातर्फे पाहणी करण्यात यावी व अहवाल सादर करण्याची सुचना डिचोली उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे. सदर पाहणी सोमवारी (दि. 18 मे) रोजी केली जाणार आहे.
पैरा मयेतील चौगुले खाण कंपनीच्य खाणीवरील खनिज मालाची सध्या ई लिलावाच्या नावाखाली वाहतूक सुरू आहे. मात्र या कंपनीच्या खनिजमिश्रीत पाण्यामुळे आणि शेतात पसरलेल्या मातीमुळे शेतांची झालेली नुकसानभरपाई देण्यास आजपर्यंत या कंपनीने टाळाटाळ केली आहे. या विरोधात मयेतील मुळाख खाजन शेतकरी संघटनेने गुरू. दि. 14 मे रोजी पैरा येथे खनिज वाहतूक अडविली होती. त्यावेळी घटनास्थळी आलेल्या मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी यशस्वी शिष्टाई करीत शेतकरी, कंपनी अधिकारी, पोलीस निरिक्षक यांची संयुक्त बैठक डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात ठरवली होती. त्यानुसार काल शुक्रवारी (दि. 15) सदर बैठक पार पडली.
खाणीवरील खनिज साठा खाली करण्यात आल्याने मातीची कडा कमकुवत होऊन ती माती येणाऱया पावसाळय़ात खाणीपासून सुमारे एक किलोमीटर असलेल्या मयेतील शेतांमध्ये वाहून येण्याची शक्मयता आहे. तसे झाल्यास अगोदरच संकटित असलेल्या शेतकऱयांसमोर अधिक संकट निर्माण होणार आहे. या विषयाकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्याची मागणी शेतकऱयांतर्फे सखाराम पेडणेकर यांनी केली. या विषयावर चर्चा होऊन सोमवारी 18 रोजी भुगर्भशास्त्रज्ञ व खाण खात्यातील संबंधित अधिकारी यांच्यातर्फे या संपूर्ण खाण भागाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचघ सुचना उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांनी दिली.
या पाहणीबरोबरच खाण कंपनीमुळे शेतांची झालेली नुकसानी, जमिन तसेच जल प्रदुषण याचीही चाचणी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. तसेच सध्या मये गावातून खनिज वाहतूक सुरू असल्याने गावात रस्त्यांवरील रहदारी धोकादायक बनली आहे. तसेच रस्त्यावर धुळप्रदुषणही वाढले असल्याने गावातील ज्या रस्त्यावरून खनिज वाहू ट्रक जातात त्या रस्त्यापासून 200 मीटरच्या आत असलेल्या घरांना धुळभत्ता देण्यात यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
पैरा गावात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या खाण व्यवसायामुळे शेतांची झालेली नुकसानी भरून देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे अद्यापही या कंपनीने पालन न करता शेतकऱयांना नुकसानभरपाई दिलेली नाही. हा विषय या संपूर्ण प्रकरणात मुळ असल्याने त्यावर उपजिल्हाधिकारी यांच्यासमोरील बैठकीत गंभीर चर्चा करण्यात आली. मात्र कंपनीच्या वकिलांनी सदर विषय वेगळय़ाच दिशेने नेताना अखिल भारतीय किसान सभेसमवेत न्यायालयात चालू असलेल्या खटल्यांची प्रकरणे या विषयाशी जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र किसान सभेतर्फे सुरू असलेले आंदोलन हे वेगळे असून मुळाख खाजन शेतकरी संघटनेतर्फे वेगळे आंदोलन सुरू असल्याचे स्पष्टीकरण यावेळी शेतकऱयांनी बैठकीत दिले.
तसेच खाण व्यवसायामुळे ज्या शेतांची नुकसानी झालेली आहे आणि न्यायालयाने आदेश देऊनही ज्या खाण कंपन्या शेतकऱयांना नुकसानभरपाई देत नाहीत त्यांच्यावर एफआयआर घालण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला होता. त्याची अंमलबजावणी डिचोलीत करण्यात यावी अशी मागणीही यावेळी शेतकऱयांनी केली. तसेच या पावसाळय़ापूर्वी पैरा खाणीवरील परिस्थिती सुधारताना खालील शेतांना संरक्षण मिळावे यासाठी गांभीर्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या मागणीवर सर्व शेतकरी ठाम असल्याचे यावेळी सखाराम पेडणेकर यांनी सांगितले.
सरकारकडे शेतकऱयांसाठी वेळ नाही, खाणींसाठी आहे.
मयेतील शेतकरी व खाण कंपन्या यांचा संघर्ष गेली अनेक वर्षे सुरूच असल्याने वेळोवेळी शेतकरी आपल्या मागण्यांसाठी खनिज वाहतूक रोखून धरतात. मात्र नंतर त्यांच्या मागण्यांवर कोणताच ठोस निर्णय होत नसल्याने गेल्या जानेवारी 2020 मध्ये डिचोली उपजिल्हाधिकारी यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांना निवेदन करून खाण कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी व स्थानिक सरकारी यंत्रणा यांची संयुक्त बैठक घेण्याची विनंती केली होती. मात्र त्यानंतर या निवेदनातील विनंतीला वाटाण्याच्या अक्षता देण्यात आल्या आहेत. अद्यापही सदर बैठक आयोजित करण्याचे सौजन्य दाखविण्यात आलेले नाही. सदर विषय शेतकऱयांशी संबंधित असल्याने त्यावर सरकारकडून गांभीर्याने पाहिले जात नाही. हाच विषय जर खाणींशी किंवा खाणी सुरू करण्याशी संलग्नित असता तर त्यावर वारंवार बैठकि घेऊन तो सोडविण्यातही आला असता. कारण सध्याचे सरकारच हे खाणवाल्यांचे असल्याने शेतकऱयांसाठी सरकारकडे वेळ नाही, तर खाणवाल्यांसाठी व त्या संबंधित विषयांसाठी भरपूर वेळ आहे. शेतकऱयांनी प्रोत्साहित होऊन कृषी क्षेत्रात यावे आणि हरीत क्रांती घडवावी, या सर्व गोष्टी केवळ भाषणे, घोषणाबाजीत आणि कागदावरच. यासाठीच राज्यातील शेतकऱयांची आज हि दशा झालेली आहे, अशी भावना सखाराम पेडणेकर यांनी व्यक्त केली.