सीमाहद्दीवरील अतिवाड फाटय़ाजवळ गोंधळ : आरटीपीसीआर बंधनकारक केल्याने कामगार परतले माघारी
प्रतिनिधी /बेळगाव
कोवाड-बेळगाव मार्गावर अतिवाड फाटय़ानजीक सीमाहद्दीत बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी शुक्रवारी महाराष्ट्रात जाणाऱया बांधकाम कामगारांची अडवणूक केली. त्यामुळे सीमाहद्दीवरील अतिवाड फाटय़ावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान बांधकाम कामगारांनी महाराष्ट्रात ये-जा करण्यासाठी मुभा द्यावी, या मागणीसाठी आंदोलन छेडले. अखेर पोलिसांनी आरटीपीसीआर किंवा कोरोना प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय महाराष्ट्रात सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना माघारी परतावे लागले.
मागील काही दिवसांपासून जिल्हय़ाच्या सीमाहद्दीवर उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर वाहनधारकांची कसून तपासणी सुरू आहे. दरम्यान आरटीपीसीआर किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जात आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर शिनोळी फाटा, राकसकोप, चलवेनहट्टी क्रॉस, अतिवाड फाटा आदी ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून चेकपोस्ट नाके उभारण्यात आले आहेत. दरम्यान या नाक्मयांवर 1 ऑगस्टपासून कसून चौकशी केली जात आहे. तसेच आरटीपीसीआर व कोरोना प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारक अडचणीत आले आहेत. शुक्रवारी सकाळी अतिवाड फाटय़ाजवळ महाराष्ट्रात जाणाऱया बांधकाम कामगारांची पोलिसांनी अडवणूक केली. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी काहीकाळ आंदोलन छेडून कोगनोळी नाक्मयावर ज्याप्रमाणे स्थानिक कामगारांना महाराष्ट्रात जाण्यासाठी मुभा दिली जात आहे, त्याप्रमाणे आम्हालाही महाराष्ट्रात ये-जा करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी लावून धरली.
कामगारवर्गातून नाराजीचा सूर
उचगाव, बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते, गोजगा, मण्णूर आदी गावांतील शेकडो बांधकाम कामगार दररोज कोवाड भागात कामाला जातात. मात्र मागील काही दिवसांपासून सीमाहद्दीवर कडक बंदोबस्त ठेवल्याने कामगारांना माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा रोजगार बुडत आहे. त्यामुळे कामगारवर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे.