बेळगाव /प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू झाली आहे. त्यामुळे शहर परिसरात वाहनावरून संचार करणाऱया अनेक जणांवर पोलिसांची करडी नजर आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रमुख चौकांमध्ये वाहनधारकांना अडवून त्यांची योग्य ती चौकशी करण्याचे काम सुरू केले आहे .त्याचप्रमाणे विनाकारण मुक्त संचार ठेवणाऱयांवर कारवाईचा बडगा उगारून त्यांना फटका देण्यात येत आहे. यामुळे परिस्थिती बऱयाच प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यात यश येत आहे.कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्व प्रकारे दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे . काही युवक मंडळी आणि इतर नागरिक विनाकारण संचार करताना दिसत आहे यासाठीच हा चौकशीचा बडगा उगारण्यात येत आहे.लग्नामुळे नागरिकांनी घरातच बसावे कुठेही विनाकारण बाहेर फिरू नये अशा सूचना सातत्याने देण्यात आल्यानंतर देखील अशा प्रकारचा संचार सुरू ठेवणारे नागरिक पोलिसांच्या कचाटय़ात येत आहेत .याची दक्षता घेऊन विनाकारण फिरणे टाळावे अशी सूचना करण्यात आली आहे.