सध्या इंटरनेटचे युग आहे. इंटरनेट हे दुधारी शस्त्र आहे. जितका त्याचा उपयोग आहे तितकाच धोकाही संभवतो. त्यामुळे एकीकडे इंटरनेटचा प्रसार देशाच्या कानाकोपऱयात करताना दुसरीकडे त्यावर योग्य ते आणि योग्य तितक्मया प्रमाणात नियंत्रण असणेही आवश्यक आहे. प्रत्येक देशाने यासंबंधी विविध कायदे केले आहेत. इंटरनेटचा व्यक्तिगत आणि समाजमनावरही मोठा परिणाम होत असल्याने यासंबंधी जागतिक धोरण काय असावे? हे निर्धारित करण्याचे काम सुरू आहे.
शिक्षण आणि कष्ट यांच्या जोरावर इंटरनेट क्षेत्रात नाव कमावलेल्या पौर्णिमा तिवारी या सध्या चर्चेत आहेत. पोलंड येथे 6 ते 10 डिसेंबर या कालावधीत होऊ घातलेल्या 16 व्या युनायटेन नेशन्स गव्हर्नन्स फोरम 2021 या परिषदेत त्या इंटरनेट क्षेत्रासंबंधी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या परिषदेत भाग घेण्यासाठी 193 देशांनी इच्छा व्यक्त केली होती. तथापि, केवळ 30 तज्ञांची निवड करण्यात आली असून त्यात पौर्णिमा तिवारी यांना स्थान मिळाले आहे.
‘इंटरनेटचा सकारात्मक आणि प्रबोधनात्मक उपयोग’ या विषयावर त्या सध्या जनजागृतीचे काम भारतात करीत आहेत. साक्षरता प्रसारासाठी इंटरनेट हा त्यांचा विशेष कार्याचा विषय आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असणाऱया तिवारी यांचे कार्य मात्र अत्यंत महत्त्वाचे असल्याने भारताच्यावतीने त्यांना या परिषदेत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘इंटरनेटचा उपयोग आणि नियंत्रक नियमावली’ या विषयावर त्या या परिषदेत भारताची भूमिका विशद करणार आहेत.