केंद्रीय रस्ते आणि जलवाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारा हा विशेष लेख…
श्री नितीन गडकरी हे असे नेतृत्व आहे, जे प्रस्थापित राजकारणी व राजकारण याची चौकट भेदून नवा भारत उभा करू शकेल. गडकरी व त्यांचे विचार कोणत्याही चौकटीत मावत नाहीत. शेवटच्या माणसाचा विकास, अंत्योदय साकारताना गडकरी जे विचार व कृती करतात, ती थक्क करणारी असते. म्हणूनच ते नेहमी नवे सांगतात, नवे करून दाखवतात आणि केवळ भाजपातच नाही तर सर्व पक्षात त्यांची लोकप्रियता आहे.
भारतीय राजकारणात नितीनजींच्या रूपाने एक बेधडक पण, तितकेच प्रगल्भ व्यक्तिमत्त्व तळपते आहे. आपल्या व्यावहारिक दृष्टीकोनामुळे तसेच स्पष्टवक्तेपणामुळे नितीनजी म्हणजे एक वेगळेच रसायन अनुभवायला मिळते. जनमानसात व अधिकारी वर्गात मानाचे स्थान मिळवणारे त्यांच्यासारखे तेच. सर्वांशी दिलखुलास वागणे, कोणताही आडपडदा न ठेवता बोलणे, सतत प्रसन्न मुदेने वावरणे आणि त्याचबरोबर आपल्या कामाच्या झपाटय़ाने सर्वांचे डोळे दिपवणे हे त्यांनाच जमते. त्यामुळेच केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.
गडकरींनी अत्यंत कमी खर्चात व वेळेत पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे उभारून दाखवला, टोल लोकांना सवयीचा केला, मुंबईत इतके उड्डाण पूल, रस्ते बांधले की, लोक त्यांना ‘पूलकरी’ म्हणून ओळखू लागले. कामाचा वेग आणि देशाचा विकास यावर ते भर देतात आणि नियम, कायदे पालन करताना, गती, प्रगती हे त्यांचे लक्ष असते. गडकरीना राजकीय वारसा नाही, त्यांनी आपला वारसही राजकारणात आणलेला नाही. त्यांना गॉडफादर नाही. तरीही आज त्यांच्या नावाचा बोलबाला सर्व पक्षात आहे. त्यामागे त्यांची बुद्धिमत्ता, कार्यशैली, कार्यनि÷ा, विचारनि÷ा, वेग आणि ‘आऊट ऑफ प्रेम’ व्यक्तिमत्त्व आहे.
स्वतःचा उद्योग सांभाळत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले गडकरी नागपुरात प्रथम नगरसेवक म्हणून राजकारणात आले. नंतर आमदार झाले. शिवसेना-भाजपाचे सरकार पहिल्यांदाच महाराष्ट्रात सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले आणि लगेचच त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते, पूल, फ्लाय ओव्हर्स बांधण्याचा सपाटा त्यांनी लावला. 20 व्या शतकात अमेरिकेने जी झेप घेतली आणि जगाचे नेतृत्व केले ते तिथल्या रस्ते बांधणीमुळे. तोच आदर्श नितीनजींसमोर असावा. दळणवळणाच्या सोयीसुविधांमधूनच देशाची प्रगती होऊ शकते, हे फार लवकर ओळखणाऱयांपैकी एक म्हणजे गडकरीसाहेब! या त्यांच्या कामामुळे ते ‘फ्लायओव्हर मॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले आणि भारतीय जनता पक्षातील अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या त्यावेळच्या श्रे÷ांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. अटलजींच्या कारकिर्दीत प्रत्यक्षात आलेली सुवर्णचतुष्कोण ही महामार्गाची कल्पना गडकरींचीच. त्यानंतर सरकारमधल्या त्याचप्रमाणे पक्षातल्या अनेक जबाबदाऱया त्यांच्याकडे चालून आल्या. 2009 साली ते पक्षाचे अध्यक्ष झाले. इतक्मया कमी वेळेत एवढी मोठी झेप घेऊ शकणारे त्यांच्यासारखे नेते विरळाच.
प्रत्येक गोष्टीत शतप्रतिशत सहभाग
ते गाण्याची मैफल असो, आंतरराष्ट्रीय सेमिनार असो, पक्षाचा मेळावा असो, अधिकारी बैठक असो, नियोजन असो, खवय्यांची पार्टी असो, प्रत्येक गोष्टीत शतप्रतिशत सहभागी असतात आणि पक्ष, प्रांत, भाषा या पलीकडे सर्वांशी मैत्री ठेवून देशाचा तिरंगा उंचावताना दिसतात. रस्ते व पूल केवळ दोन गावे जोडत नाहीत तर दोन संस्कृती, चालीरिती, व्यापार, नातीगोती, आर्थिक हितसंबंध जोडतात, असे शाळेत आपण शिकतो. पण, गडकरी हे ज्ञान व्यवहारात आणतात. त्यामुळे दुर्गम भागातही विकासाचे वारे वाहताना दिसते. जे महाराष्ट्रात गडकरींनी केले तेच त्यांनी देशभर केले. अनेक रस्ते, पूल, जल मार्ग उभे केले. अर्थव्यवस्थेला गती दिली. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर भारत एकात्म करण्यात मोठा हातभार लावला.
कुशाग्र बुद्धी, हजरजबाबीपणा आणि अजोड निर्णयक्षमतेच्या जोरावर मोठमोठे प्रश्न त्यांनी सहज हाताळले आहेत. कोणताही विषय किंवा समस्या समोर आली की, त्याबद्दलची समग्र माहिती ते चटकन मिळवतात व त्याचा सखोल अभ्यास करून सर्व बाजू तपासून ठाम निर्णय घेतात. त्यांचा अभ्यास इतका असतो की, कुणी ठरवले तरी त्यांची दिशाभूल करणे कठीण. त्यामुळे सरकारी अधिकारीदेखील त्यांना वचकून असतात. गडकरी आपल्या सहकाऱयांची काळजी घेतात, चांगली टिम बांधतात व सर्वाना प्रेरित करतात. महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेल्या या नेत्याने तिथल्या नोकरशाहीलादेखील लगेच आपलेसे केले आणि त्याचबरोबर वरचढ होऊ दिले नाही. नोकरशाहीचे व्यवस्थापन हे कोणत्याही मंत्र्यांच्या यशाचे गमक ठरते. त्यात नितीनजी वाकबगार आहेत. सगळी आकडेवारी त्यांना मुखोद्गत असते.
देशाच्या विकासाबद्दलच्या कल्पना मांडल्या
भाजपाचे अध्यक्ष झाल्यावर विकासाभिमुख राजकारणावर त्यांनी भर दिला. ‘इंडिया अस्पायर्स’ या आपल्या पुस्तकात त्यांनी देशाच्या विकासाबद्दलच्या आपल्या कल्पना सविस्तरपणे मांडल्या आहेत. सौर ऊर्जा, पर्यायी इंधन आणि कचरा व्यवस्थापन याला त्यांनी आपल्या योजनांमध्ये प्राधान्य दिले आहे. काँग्रेस शासनाच्या त्यावेळच्या निर्नायकी अवस्थेमुळे जी एक प्रकारची मरगळ आली होती, ती गडकरींच्या नव्या आणि सकारात्मक दृष्टीकोनामुळे दूर व्हायला मदत झाली.
2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जेव्हा भाजपाचे सरकार आले तेव्हा नितीन गडकरींचा ‘महामार्ग आणि रस्ते वाहतूक’ मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश झाला. त्याचबरोबर त्यांच्याकडे ‘नौकानयन’ खातेही देण्यात आले. संरक्षण आणि स्वस्त माल वाहतूक या दोन्ही दृष्टीने त्यांनी जलवाहतुकीचे महत्त्व ओळखले होते म्हणून निर्यातीला प्रोत्साहन देणाऱया शिपिंग व्यवसायाला त्यांनी महत्त्व दिले. महत्त्वाकांक्षी अशी ‘सागरमाला योजना’ त्यांनी मांडली. रस्ते वाहतूक दोन रु. प्रति किमी तर रेल्वे वाहतूक एक रु. प्रति किमी तर जलवाहतूक पन्नास पैसे प्रति किमी होते हे सांगत त्यांनी जलवाहतुकीस प्रोत्साहन दिले. शिपिंगला स्वस्त दरात कर्ज मिळावे असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे या दोन्ही खात्यांच्या कामावर प्रभाव पडला. रस्तेबांधणीद्वारे विकास साधताना त्यांनी पर्यावरणाची हानी होऊ दिली नाही. प्रत्येक प्रकल्पातील काही रक्कम त्यांनी वृक्षलागवड व परिसर सौंदर्याकरणावर खर्च केली.
गडकरीना हरतऱहेचे पदार्थ खाण्यात आणि खाऊ घालण्यात खूप आनंद आहे. भारतीय, महाराष्ट्रीयन, वैदर्भीय खाद्यपदार्थ प्रसिद्ध करण्यात त्यांचा हातखंडा आहे. ते पट्टीचे खवय्ये आहेत. वेगवेगळे पदार्थ ते आवडीने चाखतात. त्यांच्या पत्नी सौ. कांचनताई याही सुगरण आहेत. एकदा बिल गेट्स दिल्लीला आले होते. गडकरींनी त्यांना घरी बोलावले आणि कांचनाताईंनी केलेली मिसळ खाऊ घातली. डोळय़ातून नाकातून पाणी आलेले गेट्स म्हणाले, ‘आज मला प्रथमच काहीतरी खाल्ल्यासारखे वाटते!’
शेतकऱयांच्या आत्महत्या व्हायला लागल्या तेव्हा ते मोर्चे व मागण्या करत राहिले नाहीत. त्यांनी इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून साखर कारखाने नफ्यात आणण्याचा मार्ग दाखवला. अलीकडेच त्यांनी गाईच्या शेणापासून प्राकृतिक पेंट हे नवे पाऊल टाकले व शेतीत अनेक उपपदार्थ तयार करण्यासाठी योजना सांगितल्या. आत्मनिर्भर भारत ही घोषणा पण, त्यासाठीची वाटचाल करताना ते तरुण तरुणीना चार पावले बोटाला धरून मार्गी लावताना दिसत आहेत. म्हणून गडकरीचा डंका वाजतो आहे. अलीकडे त्यांची भाषणे, विचार, व्हीडिओ यांना खूप दर्शक मिळत आहेत. त्यातून त्यांना जे उत्पन्न मिळते ते त्यांनी कोव्हिड लढाईसाठी देवून आपले सामाजिक भान अधोरेखित केले आहे.
प्रधानमंत्री मोदींच्या 2019 सालच्या दुसऱया मंत्रीमंडळात महामार्ग व रस्तेबांधणी या खात्यांखेरीज त्यांच्याकडे लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग खाते आले. स्वतः उद्योजक असल्यामुळे या क्षेत्रातील आव्हाने आणि संधी तसेच या उद्योगांचे देशाच्या अर्थव्यवस्थेमधील महत्त्व यांची चांगली जाण त्यांना आहे. खासगीकरणाचे ते खंदे पुरस्कर्ते आहेत. देशाच्या विकासात खासगी गुंतवणूक वाढवण्यावर त्यांनी भर दिला आहे. स्वातंत्र्य मिळून 50-60 वर्षे झाली. तरी अनेक खेडय़ांपर्यंत पोचण्यासाठी पक्के रस्ते नव्हते. गडकरीसाहेबांच्या प्रयत्नांमुळे कित्येक खेडी शहरांना जोडली गेली आणि त्यांच्या विकासाची कवाडे उघडली. शेती आणि सहकार या क्षेत्रांचाही त्यांचा अभ्यास दांडगा आहे. या क्षेत्रातील त्यांचा अधिकार मोठा आहे.
कायद्याचे अभ्यासक, उद्योजक आणि स्वतःची अनुभवसिद्ध व्यवस्थापन शैली, कामाचा उरक, गोड पण स्पष्ट बोलणे आणि सर्वांकडून काम करून घ्यायची हातोटी तसेच विशाल आणि दूरदृष्टी, हिंदी-इंग्रजी भाषांवर प्रभुत्व आणि रा. स्व. संघाची शिस्त व देशभक्ती अशा सर्वगुणसंपन्नतेमुळे देशाचा पंतप्रधान बनण्याची क्षमता बाळगणारा हा नेता महाराष्ट्राचा आणि पर्यायाने देशाचा भाग्यविधाता ठरेल हे नक्की!
मैत्री जपणारा मित्र
माझी आणि त्यांची खास दोस्ती आहे हे नमूद करताना मला अतिशय अभिमान वाटतो. मुंबईत, गोव्यात अन् दिल्लीतही अनेकवेळा त्यांच्या भेटीचा योग आला. प्रत्येकवेळी आस्थेने चौकशी करणाऱया नितीनजींबद्दल आम्हाला खास जिव्हाळा आहे. माझा भाचा कॅप्टन नितीन धोंड आणि आता माझा मुलगा चि. प्रसाद हाही शिपिंग व्यवसायात आहे. त्यांना त्यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. कॅप्टन धोंड यांनी सुरू केलेल्या देशातील पहिल्या क्रूझचे ‘आंग्रिया’चे गडकरींनी कौतुक केले होते. ते क्रूझवर आले होते. आमच्या लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे काम त्यांनी जवळून पाहिले आहे. सोसायटीबद्दल कौतुकाचे उद्गार काढून आम्हाला प्रोत्साहन दिले आहे. सोसायटीच्या विश्वासार्हतेबद्दलचे त्यांचे आश्वासक बोल याची ग्वाही देतात. सोसायटीने पुणे शहरात ‘फास्ट टॅग’ बद्दल जी जागृती आणि प्रसाराचा उपक्रम हाती घेतला. त्याचे त्यांनी खास पत्र पाठवून विशेष कौतुकही केले आहे. गुणग्राहकता हा त्यांचा स्वभाव विशेष याप्रसंगी प्रकर्षाने जाणवला.
मध्यंतरी त्यांना एक, दोनवेळा सार्वजनिक कार्यक्रमात भोवळ आली. सगळे घाबरले. पण, गडकरींनी आपली प्रकृती, व्यायाम, प्राणायाम, आहार यातून सुधारली. त्यांना कोरोनाचा त्रास झाला होता. त्यावरही मात करत त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली, मार्गदर्शन केले. मलाही त्यांनी वजन कमी करून कार्यक्षमता वाढवायचा सल्ला दिला होता.
गडकरीचा ऑनलाईन बैठका घेणे, पक्ष कार्यकर्ते, नेते, जनता, अधिकारी यांच्याशी संपर्क करणे, या कामात कुणी हात धरू शकत नाही. टाईम आणि टायमिंगचे भान असलेला बेभान होऊन काम करणारा नेता. देशाचे, महाराष्ट्राचे नाव उंच करतो आहे. अभूतपूर्व असे त्यांचे हे काम अधिक विस्तारावे, त्यांना आरोग्य, सुख, समाधान, लाभावे याच सदिच्छा !
भरारी घेणारी देदीप्यमान वाटचाल
जनसंघ, रा. स्व. संघ, अभाविप, भाजपा अशी त्यांची एक विचाराची, नि÷sची व भरारी घेणारी वाटचाल देदीप्यमान आहे. मोदी मंत्रिमंडळातील चमकदार कामगिरी करणारे मंत्री म्हणून अवघा हिंदुस्थान त्यांना ओळखतो. त्यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा बाळगतो. पण, गडकरींचे पाय जमिनीवर असतात. त्यांची नि÷ा व बांधीलकी तसूभरही विचलित होत नाही. त्यांचे विचार सर्वांच्या पुढे धावत असतात आणि पद, लाल दिव्याची गाडी, गाडय़ांचा ताफा या पलीकडे जावून मूलभूत गोष्टींचा व कृतीचा कार्यक्रम ते करत असतात.
किरण ठाकुर,
समूह प्रमुख, सल्लागार संपादक, तरुण भारत, बेळगाव