खानापूर तालुक्मयातील पिडीओंना कलादगी यांचा सज्जड इशारा : ता. पं. प्रभारी कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली
प्रतिनिधी / बेळगाव
लोकांची सेवा हेच आपले पहिले कर्तव्य आहे. सध्या खानापूर तालुका कार्यकारी अधिकारी म्हणून आपली प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र कोणीही आपण प्रभारी आहे म्हणून कामात कसुर केल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा खानापूर तालुका पंचायतीचे प्रभारी कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी पिडीओंना दिला आहे.
पदभार स्वीकारताच त्यांनी पिडीओंची बैठक खानापूर येथील तालुका पंचायत कार्यालयात बोलविली होती. या बैठकीत त्यांनी पिडीओंना सूचनाही केल्या आहेत. बेळगाव तालुक्मयात आपण जे काम केले आहे त्याहून अधिक काम मला खानापूर तालुक्मयात करायचे आहे. जोपर्यंत आपण या पदावर आहे तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीने कामात दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. त्यामुळे नागरिकांची कामे तातडीने केल्यास ते सोयीचे ठरणार असल्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
खानापूर तालुका हा दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र या दुर्गम भागातील नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. या संधीचे सोने करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. उद्योग खात्रीतून येथील पाणंद रस्त्यांना चालना द्या, याचबरोबर तलावे व ज्या गावांना रस्ते नाहीत त्यांनाही या योजनेतून काम करण्यास नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन करा. खानापूर तालुक्मयात अनेकांना उद्योग खात्री योजनेतून काम आणि सरकारकडून मिळणारा पगार भेटल्यास हा तालुका काही प्रमाणात सुधारेल, अशी आशा मला आहे. तेंव्हा याबाबत पिडीओंनी गांभीर्याने घेऊन येत्या काळात मला कामाच्या आराखडय़ांचा ढीग देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. बेळगाव तालुक्मयात आज उद्योग खात्रीतून मोठय़ा प्रमाणात आपण पाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे फळ म्हणून मागील वषी तब्बल 30 हून अधिक तलावांची खोदाई करून महिलांना काम आणि पाणी अडविण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले आहेत. याचप्रमाणे तालुक्मयातील वनखात्याची परवानगी घेऊन जंगल भागात झाडे लावण्याबरोबरच तलावे खोदण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न असतील, असेही मल्लिकार्जुन कलादगी यांनी पिडीओंना सांगितले. यावेळी तालुक्मयातील बहुतेक पिडीओ उपस्थित होते.
नियमांचे उल्लंघन करणाऱयांची गय नाही अनेक पिडीओंनी मी प्रभारी आहे, त्यामुळे आणखी काही दिवस त्यांच्याकडे आहेत. ते बडबडतील आणि जातील असे समजू नका, विकासाच्या दृष्टिकोनातून मला दोन दिवस मिळाले तरी मी त्याचे सोने करेन. त्यासाठी सर्व पिडीओंनीही काम करण्यासाठी मला साथ देण्याची गरज आहे. खानापूर तालुका हा मोठा तालुका आहे. त्यामुळे येथे विकास करण्याची संधी अनेकांना मिळत नाही. आपण सरकारी नोकर आहोत. त्यामुळे सरकारच्या नियमात जी कामे करायची असतील ती करण्यास कोणत्याच अडचणी नाहीत. जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.