शहाजी पाटील / प्रयाग चिखली
प्रयाग चिखली परिसरातील ग्रामस्थांना उद्ध्वस्त करणारी पूरस्थिती नैसर्गिक नव्हे तर कृत्रिम आहे. शहरातील अनियंत्रित बांधकामे आणि भरावे यामुळे पूरस्थिती निर्माण होत असून यापुढे ग्रामस्थांच्यावर अन्याय होऊ नये याकरिता चिखली- आंबेवाडी ग्रामस्थांचे ३२ वर्षे रखडलेले पुनर्वसन पूर्ण क्षमतेने करावयास सरकारला भाग पाडू असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयाग चिखली येथे बोलताना केले.
माजी मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले २०१९ साली आलेल्या महापुरामुळे उध्वस्त झालेल्या चिखलीकरांना आमच्या सरकारने चंद्रकांत दादांच्या माध्यमातून भरभरून मदत केली. त्यामुळे पूरग्रस्त सावरला मात्र आमच्या काळात मंजूर-जाहीर केलेली मदत आघाडी सरकारला चिखली-आंबेवाडी पूरग्रस्तांपर्यंत पोचवण्याचेही श्रेय घेता आले नाही. हिच शोकांतिका आहे. दरम्यान पुन्हा एकदा महापुरामुळे चिखली-आंबेवाडी ग्रामस्थांवर उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. यापुढे मात्र मदतीपासून पुनर्वसनापर्यंत आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे सांगून जागतिक बँकेने अर्थसहाय्य देण्याची तयारी दर्शवली. नदीजोड हा महत्त्वकांक्षी प्रकल्प भविष्यात साकारून पुराची तीव्रता कमी करणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित पूरग्रस्तांच्या समोर सांगितले. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी चिखली व आंबेवाडी गावांची भौगोलिक स्थिती निर्माण होणारी पूरस्थिती त्याची कारणे आणि त्यावरील उपाय याबाबत आढावा घेतला.
यावेळी प्रयाग चिखली चे भाजपा संभाजीराव पाटील तसेच एस आर पाटील (संचालक गोकुळ दूध संघ) आणि रघुनाथ पाटील यांनी गावातील पूर स्थिती आणि गावचे पुनर्वसन या बाबत माहिती देताना गावच्या पूरस्थिती ला शहरातील अनधिकृत बांधकामासाठी झालेले भरावे आणि कोल्हापूर -रत्नागिरी महामार्ग तसेच शिरोली हायवे चा भरावा कारणीभूत असल्याचे सांगून याठिकाणी उड्डाण पुलांच्या बांधकामा बरोबरच चिखलीचे तब्बल बत्तीस वर्षे रखडलेले पुनर्वसन मार्गी लावण्याची एकमुखी मागणी केली. यावेळी प्रयाग चिखली पूरग्रस्त ग्रामस्थांच्या वतीने पूर्णक्षमतेने पुनर्वसन करण्याच्या मागणीचे निवेदन यावेळी माझी मुख्यमंत्री फडणवीस तसेच प्रवीण दरेकर चंद्रकांत दादा यांना देण्यात आले. मान्यवरांनी प्रयाग यावेळी महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
दरम्यान पाडळी बुद्रुक येथील ग्रामस्थांच्यावतीने सुमारे 80 टक्के ग्रामस्थांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून गावाला मदत करण्याबरोबरच पुनर्वसन सुरक्षित स्थळी करावे अशा आशयाचे निवेदन पाडळी ग्रामस्थांच्या वतीने या वेळी देण्यात आले. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर चंद्रकांत दादा पाटील माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आंबेवाडी येथील पूरग्रस्त ग्रामस्थांना भेट दिली यावेळी येथील हनुमान मंदिरामध्ये झालेल्या सभेत सरपंच सिकंदर मुजावर यांनी गावातील पूरस्थिती ची माहिती दिली आणि गावाच्या पुनर्वसनाची प्रमुख मागणी केली यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न सरकार पुढे प्राधान्याने मांडणार असल्याचे आश्वासन दिले तसेच नदी जोड महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पाठपुरावा करून या परिसरात महापूर येऊच नये यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे ही ते म्हणाले.
यावेळी गावच्यावतीने पूरग्रस्त मदत आणि पुनर्वसनाचा ची मागणी असलेल्या आशयाचे निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले
यावेळी अनेक पूरग्रस्तांना पुराच्या स्थितीबाबत माहिती देऊन मदतीची अपेक्षा मान्यवरांकडे केली.
दादांचे “दादा” काम
यावेळी चिखलीचे संभाजीराव पाटील म्हणाले २०१९ साली महापुराने उद्ध्वस्त झालेल्या चिखली व आंबेवाडी च्या ग्रामस्थांना चंद्रकांत दादा यांनी अत्यंत तत्परतेने तातडीची मदत, पशुधन नुकसान मदत, शेती नुकसान मदत, कर्जमाफी, घरांची पडझड मदत,आणि घर भाडेही अशा प्रकारची चौफेर मदत करून चिखलीकरांना सावरण्याचे “दादा” काम चंद्रकांत दादा यांनी केल्यामुळेच चिखलीकर सावरला होता.
१) प्रयाग चिखली येथील सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस सोबत प्रवीण दरेकर चंद्रकांत दादा पाटील धनंजय महाडिक
२) प्रयाग चिखली येथील ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देताना एस आर पाटील संभाजीराव पाटील रघुनाथ पाटील केवलसिंग रजपुत
३) आंबेवाडी ग्रामस्थांच्यावतीने देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना सरपंच सिकंदर मुजावर सोबत प्रवीण दरेकर चंद्रकांत दादा पाटील धनंजय महाडिक आधी