मागील आठवडय़ात नीती आयोगाचे उपसल्लागार डॉ. मुनीराजू एस बी. यांनी अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱया एका प्रश्नाच्या सोडवणुकीबाबत स्वत: पुढाकार घेऊन देशातील वरि÷ समाजकार्य प्रशिक्षकांशी आभासी माध्यमातून संवाद साधला. या सर्वसमावेशक बैठकीमध्ये पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्य वगळता सर्व जाणत्या मंडळींचा सहभाग होता. सर्वच उपस्थितांनी या आश्वासक बैठकींचे मन:पूर्वक स्वागत केले. ‘समाजकार्य’ या व्यावसायिक सेवेअंतर्गत येणाऱया अनेक वैशिष्टय़पूर्ण सेवांना भारत देश वगळता अमेरिका, इंग्लड, ऑस्ट्रेलिया आदि देशात ‘व्यवसाय’ म्हणून दर्जा आहे. अनेक देशांमध्ये समुपदेशक, समुदाय संघटक, शाळा वा वृद्धाश्रमातील समाज सेवक, रोगनिवारक (थेरेपिस्ट), सहाय्यक, उपचारक, आदि तत्सम पदांवर काम करण्यासाठी समाज कार्यकर्त्यांना व्यावसायिक परवाना वा सनद घेऊन काम करता येते. त्यासाठी तेथे व्यावसायिक परिषदा (प्रोफेशनल कौन्सिल्स) असतात. परिषदेच्या माध्यमातून सेवा देऊ इच्छिणाऱया स्वयंसेवकांची-व्यावसायिकांची नोंदणी होत असते. त्यांचे ज्ञान (अद्ययावत), कौशल्ये (समर्पक) आणि अभिवृत्ती (व्यवसायानुरूप) असण्याबाबत विधिवत पडताळा आणि परीक्षा होऊन, त्यांना मान्यताप्राप्त व्यावसायिक सेवकांचा (सर्टीफाईड प्रोफेशनल) दर्जा मिळतो. आपल्या देशात काही व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबत अशा परिषदा आहेत आणि त्यामार्फत अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेचे नियमन केले जाते. वैद्यक, परिचारक, औषध निर्माते-विपेते, वकील, अभियांत्रिकी आदि सेवा व्यावसायिकांना आपल्याकडे परवाना वा सनद मिळते. या परवान्यांमुळे व्यावसायिकांना शासकीय, निम-शासकीय वा खासगी संस्थांमध्ये सेवा देता येतात. स्वतंत्र व्यवसाय वा सेवा उद्योगही उभे करता येतात.
समाजकार्यामधील ‘सेवे’ बाबतची परंपरागत धारणा ही पुण्य, मोक्ष, सत्कर्म अशा आध्यात्मिक कल्पनांसोबत ‘दृढ’ असल्यामुळे भारतीय समाजमानस सेवेला (सर्व्हिस) सहजपणे व्यवसाय (प्रोफेशन) म्हणून स्वीकारण्यास धजावत नाही. अर्थात त्यासाठी सुसंघटित, जोरकस आणि सुस्पष्ट प्रयत्नही एकवटला गेल्याचा दाखला वा पूर्वपीठिका नाही. काही व्यवसाय आणि त्याबाबत समाजाच्या संलग्नित असलेल्या पारंपरिक धारणा यातून भारतीय समाज दर्शनात आकांक्षा (ऍस्पिरेशन) आणि अपेक्षित प्रतिसाद (रिस्पॉन्स) याबाबत एक गोंधळलेलेपण नेहमीच राहिलेले आहे. पत्रकारिता म्हणजे ‘सत्यान्वेषी व्रत’, शिक्षक म्हणजे नोकरी व्यवसाय नसून ‘पेशा’, वैद्यक म्हणजे ‘समर्पण आणि देवदूत’, परिचारिक म्हणजे ‘तत्परता’ या ढोबळ धारणांनी, समाज जीवनात व्यावसायिक बांधीलकी, पारदर्शकता, जबाबदेही आणि उत्तरदायित्व या गुणांपेक्षा उदात्तीकरणाच्या भावनेला अधिक स्थान मिळालेले आढळते.
समाजसेवेची आपल्या देशाला मोठी परंपरा असून सेवेच्या, धर्माधि÷ित प्रेरणेला आणि जाणिवेला अभ्यासाच्या कक्षेत आणण्याचा बौद्धिक कंटाळा स्थानिक अभ्यासकांनी सदैवच बाळगला आहे. महादेव गोविंद रानडे यांचे शिष्य आणि महात्मा गांधीचे राजकीय गुरु नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये स्थापन केलेल्या ‘सर्व्हंट्स्?ा ऑफ इंडिया सोसायटी’ चे आद्य प्रशिक्षण, राष्ट्रीय विकासाचा दृष्टिकोन आणि सेवा शिष्यवृत्ती प्रयत्नांना आजही दुर्लक्षित केले जाते. मुंबई महानगर पालिकेमध्ये इंजिनीयर असणारे अमृतलाल ठक्कर यांनी शासकीय नोकरी सोडून सोसायटीच्या माध्यमातून देशासाठी दिलेले योगदान निव्वळ ‘श्रुत’ नसून लिखितही आहे. भारतात समाजकार्य प्रशिक्षणाची सुरुवात सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून (1936) झाल्याचे सांगण्यात येते. पहिले संचालक डॉ. क्लिफोर्ड मॅन्सहर्ट हे अमेरिकन मिशनच्या माध्यमातून भारतात धर्मप्रसाराच्या कार्यासाठी आले होते. त्यांचे अमेरिकन मराठी मिशन आणि नागपाडा नेबरहुड हाऊसमधील योगदान सर्वश्रुत आहे. त्यांनी सेवा प्रशासनातील पदविका अभ्यासक्रम भारताला दिला. या अभ्यासक्रमाची मूलभूत धारणा ही ‘ज्युडो ख्रिश्चन’ असण्यासोबतच, या अभ्यासक्रमावर इंग्लंड आणि अमेरिकेमधील सेटलमेंट हाऊस चळवळीचा प्रभाव होता. या अभ्यासक्रमासाठीचे वाचन साहित्य शिकागो विद्यापीठातून आणले गेले होते. पुढे टाटा संस्थेच्या माध्यमातून पहिल्या पिढीतील अनेक शिक्षक अमेरिकेला जाऊन प्रशिक्षण घेऊन आले आहेत. सत्तर टक्क्मयांपेक्षा जास्त समाज हा ग्रामीण, कृषीआधारित अर्थव्यवस्थेत, परंपरानि÷, जात आणि पितृसत्ताकतेच्या घट्ट संरचनांमध्ये अवरुद्ध असताना भारतात आलेले समाजकार्याचे प्रारुप अवशि÷ (रिस्युडअल), उपचारात्मक (रेमेडियल) आणि पुनर्वसनात्मक (रिहॅबिलेटिव्ह) दृष्टिकोनात अडकलेले राहिले. पुढे समाजकार्याच्या पद्धती भारतीय दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर विकसित न करता बाहेरूनच आणल्या गेल्या. या सर्व पद्धतींची उपयुक्तता लक्षात घेऊनही समाजकार्याला स्थानिक-भारतीय आकार आणि जाणिवा देण्यात स्थानिक देशीय साहित्य निर्मितीतील आणि संशोधनातील प्रयत्न मर्यादित राहिल्याचे अभ्यासकांचे स्पष्ट प्रतिपादन आहे. फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा हा सामाजिक न्याय आणि मानवी मुक्तीचा भारतीय उद्घोष आहे. त्याचेही पुरेसे प्रतिबिंब अभ्यासक्रमात नाही. ‘क्षेत्रकार्य’ हा समाजकार्य विषयाचा आत्मा आहे. या आत्म्याच्या स्पंदनामध्ये भारतीय समाज सुधारकांचा चिवटपणा आणि रानडे-आगरकर, गांधी विचारांच्या रचनात्मक कार्याचे प्रतिबिंब अभावानेच दिसते.
क्षेत्रकार्य संस्थात्मक पातळीहून समुदायाच्या वा संरचनेच्या केंद्राकडे जाणे अपेक्षित होते. समाजकार्य प्रशिक्षणाच्या बहुतांशी संस्था या नागरी भागात स्थित राहिल्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी समुदायांच्या अभ्यासाचे आणि अभ्युदयाचे मार्गही थिटे राहिल्याचे दिसतात. समाजकार्य अभ्यासक्रमापुढे आणि व्यावसायिकांपुढे ओळख (आयडेंटिटी), दृष्यात्मकता (व्हिजिबिलिटी) आणि विश्वासार्हतेचे (पेडिबिलिटी) प्रश्न निर्माण होणे साहजिकच होते. समाजकार्याचे प्रशिक्षण देणाऱया संस्थांचे (विद्यापीठे, महाविद्यालये) प्रारुप आणि अभ्यास पद्धती वेगवेगळी राहिल्यामुळे समाजकार्याच्या भविष्याची सैद्धांतिक चर्चा मूलभूत प्रश्नातच अडकून राहिली. समाजकार्य व्यावसायिकांचे प्रश्न कसे सोडवायचे यावर अपेक्षित चर्चा आणि मतैक्मय होण्यापेक्षा प्रश्न कुणी सोडवायचे हा नेतृत्वाचा प्रश्न दुर्दैवाने जास्त महत्त्वाचा राहिला. जुन्या संघटनांचे साचलेपण, नव्या संघटनांचे एकारलेपण आणि उत्तर आधुनिक पिढीची आत्ममग्न अवस्था यातून प्रश्नांची गुंतागुंत अधिकच वाढलेली आहे. शासकीय पातळीवर संधीची विपुलता आहे. प्रत्येक शासकीय खात्यात सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका आणि योगदानही आहे. समाजकार्य शिक्षणाबाबत आतापावेतो विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पातळीवर तीनदा आढावा घेतला गेला. फक्त 64 पानांचा, पहिला आढावा लिहिण्यासाठी समितीला पाच वर्षे लागली होती. अभ्यासक्रमाच्या प्रमाणिकीकरणाचे आणि परिषदेच्या उभारणीचे प्रश्न प्रलंबित राहिल्याचा इतिहास आहे. शिक्षणाच्या गुणवत्तापूर्ण सार्वत्रिकीकरणाशिवाय, जागतिकीकरणाच्या झंझावातात लोकशाहीचा परिघ आधीच निमूळता झालेला आहे. तत्त्वहीन राज्यकर्ते आणि बेबंद नोकरशाहीच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न जुनाच आहे. व्यवस्थेच्या
पुनर्रचनेशिवाय आधुनिकीकरण गावांपर्यंत पोहोचले आहे. माध्यमांचा वेग आणि प्रसार वाढलेला आहे. वंचित समुदाय घटकांच्या आकांक्षा वाढताना नैसर्गिक संसाधने लोप पावत आहेत. या पार्श्वभूमीवर समाजकार्य अभ्यासाची-संस्थांची पुनर्मांडणी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात नियमन आणि गुणवत्ता आवश्यक आहे. प्रलंबित आणि प्रस्तावित व्यावसायिक समाजकार्य राष्ट्रीय परिषदेची आवश्यकता पूर्वीपेक्षा अधिकच आवश्यक झालेली आहे.
डॉ. जगदीश जाधव