मुंबई प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस पक्षावर टीका केली होती. पण त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिल आहे.नरेंद्र मोदी इतरांवर टीका करताना स्वत:च्या पक्षातील घराणेशाही लपवतात.पण महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस हे देखील घराणेशाहीचंच प्रॉडक्ट असल्याचे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पंतप्रधान मोदी हे काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका करतात. आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहोत, असं म्हणतात. पण उत्तर प्रदेशात भाजपने घराणेशाहीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ५६ जणांना उमेदवारी दिली आहे. या सर्व उमेदवारांच्या घरातील कोणी ना कोणी यापूर्वी राजकारणात होते. तर गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने पती-पत्नीच्या तीन जोड्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप दुसऱ्यांवर टीका करताना स्वत:च्या पक्षातील घराणेशाही लपवते.अशी देखील टीका नवाब मलिक यांनी केली आहे.