भाजी उत्पादकानाही आशादायक दिलासा.
उदय / वाळपई
सत्तरी तालुक्मयातील केरी ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱया केळावडे भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात पिकणारी भेंडी व इतर स्वरूपाचे भाजीची उचल गोवा फलोत्पादन महामंडळातर्फे सुरु झाल्यामुळे उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या जवळपास चार दिवसांपासून लॉकडाऊन प्रक्रियेमुळे भाजीचा साठा मोठय़ा प्रमाणात उत्पादकांच्या घरांमध्ये पडून राहिला होता. यामुळे निर्माण झालेली चिंता फलोत्पादन महामंडळाच्या व्यवस्थापनाने चांगल्या प्रकारचे सहकार्य केल्यामुळे दूर झालेली आहे. आतापर्यंत जवळपास दोन टनांपेक्षा जास्त भेंडी व इतर स्वरूपाची भाजीची उचल या महामंडळातर्फे करण्यात आल्याचे एकूण मिळालेल्या माहितीचा समजते .
याबाबतची माहिती अशी की अंजुणे याठिकाणी धरण प्रकल्प उभारण्यात आल्या नंतर या धरणाच्या माध्यमातून केळावडे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. या पाण्याचा चांगल्या प्रकारे उपयोग या भागातील नागरिकांनी केला असून आपल्या जमिनीमध्ये गेल्या काही वर्षापासून भाजी पिकविण्यास सुरुवात केलेली आहे. सुरुवातीच्या काळात अवघ्याच उत्पादकांनी आपल्या जमिनीमध्ये भाजी विकण्यास सुरुवात केली होती .यामुळे त्यांनी चांगल्या प्रकारे यात यश संपादन केल्यानंतर यातून प्रोत्साहन मिळवीत इतर नागरिकांनीही मोठय़ा प्रमाणात भाजीचे मळे पिकविण्यास प्रारंभ केलेला आहे. गेल्या सहा वर्षापासून सत्तरी तालुक्मयातील केळावडे भाग हा भाजीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे केंद्र ठरू लागले आहे. यंदाही मोठय़ा प्रमाणात या भागातील नागरिकांनी आपल्या जमिनीमध्ये भेंडी व इतर स्वरूपाची भाजी घातली होती .मात्र जागतिक पातळीवर कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर सदर भाजी मार्केट मधून घेऊन जाण्यासाठी वाहन उपलब्ध होत नसल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून या भागातील उत्पादकांची भाजी घरांमध्ये पडून राहिली होती. याची दखल घेत भागातील जागृती युवक विनय गावस यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ जारी करून यासंदर्भात ची माहिती फलोत्पादन महामंडळाच्या व्यवस्थापनाला प्राप्त झाल्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेऊन गेल्या चार दिवसांपासून याभागातील भाजीची उचल करण्याकरता खास वाहनाची सोय केलेली आहे .त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून या भागांमध्ये खास वाहनातून मोठय़ा प्रमाणात भाजीची उचर सुरू झाल्याचे समजते. यामुळे लोकडाऊन कार्यकाळात सुद्धा गोवा फलोत्पादन महामंडळाने या भागातील भाजी उत्पादकांना दिलेले सहकार्याचे बळ यामुळे या भागातील उत्पादकाने समाधान व्यक्त केलेले आहे. याबाबत विनय गावस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अंजुणे धरणाच्या पाण्याच्या पुरवठय़ावर याभागातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात भाजीचे मळे फुलविले आहेत. गेल्या जवळपास सहा वर्षापासून केवळ याभागातील भाजी गोव्याच्या भाजी बाजारपेठेमध्ये मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होताना दिसत आहे. या भागातील जमिनीमध्ये भाजी विक्री करण्याची पोषकतत्वे असल्यामुळे या भाजीला वेगळय़ा प्रकारची चव निर्माण होत असते. यामुळे बाजारपेठेमध्ये या भाजीला चांगल्या प्रकारची मागणी आहे. दरवषी गोव्याच्या बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात भाजी उपलब्ध होण्याची प्रक्रिया या गावातून निर्माण झाल्यामुळे येणाऱया काळातही हा गाव भाजी उत्पादनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे केंद्र बनण्याचा मार्ग सुकर झालेला आहे. सध्या गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात भाजीचा तुटवडा भासत असून कर्नाटक भागातून मोठय़ा प्रमाणात भाजी च्या गाडय़ा गोव्यामध्ये येत आहेत. अशाच अवस्थेत केळावडे भागातील नागरिकांनी भाजी उत्पादनाच्या माध्यमातून गोव्याला दाखवून दिलेले उदाहरण हे खरोखरच येणाऱया काळासाठी इतर भाजी उत्पादकांसाठी वेगवेगळय़ा प्रकारचे प्रोत्साहन निर्माण करणारी बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.