बागायत खात्याची माहिती, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण खात्री योजनेंतर्गत लाभ
प्रतिनिधी / बेळगाव
बागायत क्षेत्र वाढविण्याबरोबर फळबाग शेतकऱयांना आर्थिक बळकटी देण्यासाठी बागायत खात्यामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध जातींच्या रोप लागवडीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. कोरोना व लॉकडाऊन काळातदेखील ही महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत असून संबंधितांनी चन्नम्मा सर्कल येथील बागायत खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बागायत खात्यामार्फत करण्यात आले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कर्नाटक राज्य देशात आघाडीवर आहे. बेळगाव जिल्हय़ातदेखील विविध जातीची पिके घेतली जातात. शिवाय बागायत क्षेत्रदेखील अधिक प्रमाणात असून जिल्हय़ातील 2 लाखांहून अधिक शेतकरी फळबागेवर अवलंबून आहेत. अशा फळबाग शेतकऱयांना अधिक लाभ मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना उपयुक्त ठरत आहे. या योजनेंतर्गत चिंच, आंबा, मका, काजू, नारळ, डाळिंब, जांभूळ, लिंबू, अंजीर, पेरू, दाक्षे, सीताफळ, शेवगा, कडीपत्ता, आवळा, फणस, गुलाब, मोगरा, सूर्यफुल यासारख्या विविध जातीच्या रोपांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण खात्री योजनेंतर्गत अनुसूचित जाती, बीपीएल कार्डधारक, अल्प-भूधारक शेतकरी, इंदिरा आवास लाभार्थी, भटक्मया जमाती आदी घटकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेंतर्गत फळबाग पिकांची लागवड करण्यास इच्छुक असणाऱया शेतकऱयांनी आपल्या शेतीचा उतारा, आधार कार्ड, जॉब कार्ड (रोजगार हमी कार्ड), पासपोर्ट फोटो, बँक पासबुक झेरॉक्स आदी कागदपत्रे घेऊन जवळच्या रयत संपर्क केंद्रात किंवा बागायत खाते, तालुका बागायत कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बागायत खात्याने बागायत क्षेत्र विकासासाठी हे पाऊल उचलले असून अलीकडच्या काही वर्षात बागायत क्षेत्र वाढत आहे. दरवषी खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱयांना आवाहन केले जात असले तरी अद्यापही या योजनेपासून बरेच शेतकरी वंचित आहेत. अशा शेतकऱयांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेऊन आर्थिक स्थिती बळकट करावी, असे आवाहन खात्याने केले आहे. महत्त्वाचे म्हणजे उद्योग खात्री योजनेंतर्गत ही योजना राबविण्यात येत असल्याने उद्योग खात्री योजनेतील लाभार्थ्यांना हे काम मिळणार आहे.
खात्यामार्फत मातीचे परीक्षण करून बागायत शेती करणाऱया शेतकऱयांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शिवाय स्थानिक वातावरणाला जुळवून घेतील अशा फळरोपांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱयांना फुलझाडे, भाजीपाला, मसाले, सुगंधी व सजावटीची झाडे फुलविण्याची संधी मिळणार आहे.
फळा-फुलांची रोपे आणि इतर पिकाऊ शेती एकरुप झाली तर याचा फायदा शेतकऱयांना नक्की होणार आहे. शेतात झाडे लावली तर पिके वाया जातील, अशा भीतीपोटी फळा-फुलांच्या झाडांकडे दुर्लक्ष केले जाते. शेतकऱयांना आर्थिक बळकटी येण्यासाठी शिवारात फळा-फुलांची झाडे आवश्यक आहेत, अशी माहितीही खात्याने दिली आहे. त्या दृष्टिकोनातूनच खात्यामार्फत रोप लागवडीनंतर अनुदान मंजूर केले जाते. सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली असून जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे बागायत शेतकऱयांनी रोप लागवडीसाठी पुढे यावे, असे आवाहन खात्याने केले आहे.
बागायत क्षेत्र वाढीसाठी मदत होणार
प्रति हेक्टर शेतकऱयांना अनुदान दिले जाणार असून या संधीचा संबंधित शेतकऱयांनी लाभ घ्यावा. या योजनेमुळे बागायत क्षेत्र वाढीसाठी मदत होणार आहे. ग्रामीण भागातील लहान शेतकऱयांनी आधुनिक पद्धतीने शेती करून फुला-फळांच्या शेतीचे क्षेत्र वाढवावे.
– प्रवीण महेंद्रकर (साहाय्यक संचालक, बागायत खाते)
शासनाच्या अनुदानाचा फायदा घेऊन फळा-फुलांची शेती करा
गतवषी खात्याकडून अनुदान घेऊन 1200 गुलाबाची रोप लागवड केली होती. यंदा त्यामध्ये वाढ करून 2 हजार रोपांची लागवड अर्धा एकरमध्ये केली आहे. फूल शेतीदेखील फायदेशीर असून शेतकऱयांनी शासनाच्या अनुदानाचा फायदा घेऊन फळा-फुलांची शेती करावी. गुलाबाची फुलेदेखील बहरून आली आहेत.
– केदारी भीमा टोपकर (फूल उत्पादक शेतकरी, नंदिहळ्ळी)