केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली, नागपूर / वृत्तसंस्था
रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने दि. 15-16 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून ‘फास्टॅग’ची कडक अंमलबजावणी करण्याची घोषणा रविवारी केली आहे. वाहनांवर ‘फास्टॅग’ नसल्यास दुप्पट टोलवसुली करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 16 फेब्रुवारीपासून चारचाकी वाहनांना फास्टॅग लावणे गरजेचे असून 15 फेबुवारी ही वाहनधारकांसाठी अंतिम मुदत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे बोलताना सांगितले. नागरिकांना फास्टॅग लावण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी टोलनाक्मयाशेजारीच फास्टॅगच्या विक्रीची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्व चारचाकी वाहनांसाठी 1 जानेवारी 2021 पासून ‘फास्टॅग’ अनिवार्य करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढून आदेश जारी केला होता. मात्र, त्यानंतर फास्?टॅग लावण्याची मुदत 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली होती. आता मात्र कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर टोलनाक्मयांवर फास्टॅग लेन सुरू करण्यात आले आहे. विना फास्टॅग वाहनांनी फास्टॅग मार्गिकेचा वापर केला तर वाहनांना दुप्पट टोल आकारला जाईल. सुरुवातीला टोलनाक्मयांवरील 75 टक्के मार्गिकांवरच ही योजना असेल, तर उर्वरित मार्गिकांवर टोल भरण्यासाठी रोख रकमेची सुविधा असणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत जवळपास 90 टक्के चारचाकी वाहनांनी फास्टॅग लावला असून केवळ 10 टक्के वाहने फास्टॅगविना असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कॅशलेस सेवा, झटपट प्रवास
या योजनेमुळे टोलनाक्मयातून जाणाऱया वाहनांचा प्रवास कॅशलेस आणि झटपट होतो. वाहनावर फास्टॅग बसवण्यात आल्यानंतर टोलनाक्मयावर येताच तेथील सुसज्ज अशा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशनद्वारे टोलनाक्मयांवर बसवण्यात आलेले सेन्सर वाहनावरील टॅग वाचल्यानंतर टोलचे पैसे वाहनधारकाच्या खात्यातून वजा केले जातात. पैसे खात्यातूच जाताच वाहनधारकाला नोंदणी असलेल्या मोबाईल क्रमांकावर त्याची माहिती मिळते. टोलनाके कॅशलेस झाल्याने तसेच फास्टॅगच्या येण्याने कर्मचाऱयांसोबतच वाहनचालकांचाही वेळ वाचणार आहे.
इंधन-वेळेची बचत
यापूर्वी 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅगची अंमलबजावणी करण्याची घोषणा करण्यात आली होती. केंद्र सरकारने टोलनाक्मयावर टोलवसुली सोपी आणि सुरक्षित बनवण्यासोबतच वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी चार चाकी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य केले आहे. त्यासाठीच 16 फेबुवारीपासून प्रत्येक चारचाकी वाहनाला फास्टॅग बंधनकारक असणार आहे. फास्टॅगची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्मयांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचे इंधन आणि प्रवाशांचा वेळ या दोन्ही गोष्टी वाचतील.
‘फास्टॅग’ स्टिकर…
वाहनधारकांच्या फास्टॅग खात्यामधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. सद्यस्थितीत फास्टॅग स्टिकरची वैधता पाच वर्षांची असणार आहे. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर नव्याने फास्टॅग खरेदी करावे लागणार आहेत.