सेन्सेक्स 306.54 अंकांनी वधारला : स्टेट बँकेचे समभाग सर्वाधिक तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील सहा सत्रांमधील शेअर बाजाराचा प्रवास गुरुवारी घसरणीमुळे खंडीत झाला होता. परंतु हे घसरणीचे वातावरण आठवडय़ातील अंतिम सत्रात मुंबई शेअर बाजारातील बँकिंग क्षेत्रातील मजबूत कामगिरीने पुन्हा गमावलेली तेजी परतवली आहे. दिवसभरात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि भारतीय स्टेट बँक(एसबीआय) या सारख्या बँकांच्या समभागातील तेजीच्या जोरावर बाजाराला सावरण्यास मदत झाली आहे.
दिवसभरातील कामगिरीमध्ये दिवसअखेर सेन्सेक्स 306.54 अंकांनी वधारुन निर्देशांक 34,287.24 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 113.05 अंकांनी वधारुन निर्देशांक 10,142.15 वर बंद झाला आहे. या कामगिरीमध्ये शुक्रवारी स्टेट बँकेने बाजी मारली आहे. कारण स्टेट बँकेचा तिमाही अहवालात नफा चार टक्क्मयांनी वाढून 3,580.81 कोटी रुपयाच्या घरात पोहोचला आहे. आणि याचाच सकारात्मक परिणाम सेन्सेक्सच्या आलेखावर झाला आहे. यामध्ये एसबीआयचे समभाग तब्बल आठ टक्क्मयांनी वधारले होते. तर अन्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, ऍक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग तेजीत राहिले होते. मात्र टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज ऑटो आणि इन्फोसिस यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले आहेत.
उद्योग जगतामधील कर्जमुक्तीकडे वाटचाल करणारी रिलायन्स इंडस्ट्रीजची जिओ प्लॅटफार्ममध्ये शुक्रवारी अबुधाबीमधील मुबादला इन्वेस्टरने गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. यात जिओमधील 1.85 टक्के हिस्सा 9,093.60 कोटी रुपयाना खरेदी करणार आहे. आणि याचाच प्रभाव म्हणून शुक्रवारी शेअर बाजारात रिलायन्सचे समभाग मागील वर्षभरातील उच्चांकी पातळीवर पोहोचले होते.
जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक संकेतामुळे आणि विदेशी गुंतवणूकाकडून होणाऱया लिलावाचा वेग कायम असल्यामुळे देशातील शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. तसेचे लॉकडाऊनमध्ये मिळत असणाऱया काहीशा शिथिलतेमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत होत असल्याचे या घटनेमुळे पहावयास मिळत आहे.