रणजी चषक क्रिकेट स्पर्धा : दिल्लीचे आव्हान संपुष्टात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बंगाल, मुंबई, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व उत्तराखंड संघांनी रणजी चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. सर्वही 8 इलाईट ग्रूप टॉपर्समध्ये किमान गुण असणारा झारखंडचा संघ एकमेव उपउपांत्यपूर्व लढतीत प्लेट ग्रूप टॉपर नागालँडचा सामना करेल आणि यातून उपांत्यपूर्व फेरीतील शेवटचा संघ निश्चित होईल. झारखंड-नागालँड यांच्यातील लढत दि. 12 मार्चपासून खेळवली जाणार आहे.
यंदाची रणजी चषक स्पर्धा दोन वर्षांच्या अंतराने खेळवली जात असून 17 फेब्रुवारीला स्पर्धेची सुरुवात झाली. यंदा 10 फेब्रुवारी ते 15 मार्च व त्यानंतर 30 मे ते 26 जून अशा दोन टप्प्यात स्पर्धेतील सामने होणार आहेत. यादरम्यान, एकूण 64 सामने खेळवले जातील.