कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा अद्याप बंदच : बससेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकातून महाराष्ट्राच्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी ठिकाणी बससेवा सुरू असली तरी शेजारील चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्मयात बससेवा ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मागील काही महिन्यांपासून बससेवा बंद असल्याने प्रवाशांना मिळेल त्या वाहनांने प्रवास करावा लागत आहे.
चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज भागातून बेळगावला येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. दैनंदिन खरेदीसाठी येणाऱया ग्राहकांची संख्याही अधिक आहे. मात्र महाराष्ट्राची लालपरी काही महिन्यांपासून बंद आहे. त्याबरोबर कर्नाटकची बसदेखील या भागात अद्याप धावली नाही. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान वेळेत वडाप वाहनेदेखील उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना तासन्तास बसथांब्यांवर ताटकळत थांबावे लागत आहे.
बेळगाव तालुक्मयाला लागून असलेल्या चंदगड तालुक्मयाची सर्रास जनता विविध कामांकरिता बेळगावला येत असते. यामध्ये नोकरदार, कामगार, विद्यार्थी, खरेदीदार व रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र दोन्ही राज्यांची बससेवा ठप्प असल्याने चंदगड तालुक्मयातील नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत. कोरोनाच्या दुसऱया लाटेपासून चंदगड तालुक्मयात कर्नाटकची बससेवा ठप्प झाली आहे. महाराष्ट्रात कर्मचाऱयांचा संप सुरू असल्याने बससेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची वाताहात होताना दिसत आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र दोन्ही राज्यांची बससेवा चंदगड तालुक्मयात ठप्प झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांवरच अवलंबून रहावे लागत आहे. विशेषतः चंदगड तालुक्मयातील विद्यार्थी वर्गाचे अतोनात हाल होत आहेत.
पासधारक विद्यार्थ्यांना पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या परिवहन मंडळांनी बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.