बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकण्यात आल्याने नागरीकांच्या समस्येत भर
प्रतिनिधी/ बेळगाव
इमारत बांधकाम साहित्य रस्त्यावर किंवा रस्त्या शेजारी टाकू नये अशी अट बांधकाम परवाना देताना घालण्यात येते. मात्र या अटीचे पालन होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. मारूती गल्ली, रामलिंगखिंडगल्लीसह शहर आणि उपनगरात रस्त्यावरच बांधकाम साहित्य टाकण्यात आल्याने वाहनधारकांना समस्येला सामोरे जावे लागत आहे. याकडे महापालिकेच्या अभियंत्यांनी कानाडोळा केला असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहर व उपनगरात इमारत बांधकामासाठी महापालिकेकडून बांधकाम परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र नागरिकांच्या तसेच वाहनधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध अटी घालून बांधकाम परवाना मंजूर केला जातो. इमारत बांधताना सेटबॅक सोडणे, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवूनये, जुन्या साहित्याची विल्हेवाट लावावी, गटारीमध्ये बांधकाम साहित्य साचले असल्यास वेळेवर स्वच्छ करून सांडपाण्याचा निचरा व्हावा या दृष्टीने दक्षता घ्यावी, तसेच शेजारी राहणाऱया नागरिकांना बांधकामाचा अडथळा होणार नाही याची काळजी घेणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांश ठिकाणी बांधकाम परवान्याच्या नियमावलीचे पालन होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणे. तसेच गटारीमध्ये माती किंवा बांधकाम साहित्य पडणे अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी सेटबॅक सोडण्यात येत नसल्याच्या तक्रारी होत