जिल्हाधिकारी-पोलीसप्रमुखांकडे मागणी
वार्ताहर / उचगाव
बाची, तुरमुरी, कोनेवाडी व शिनोळी परिसरातील शेतकरीवर्गाला ये-जा करत असताना बाची येथील चेकपोस्टवर कर्नाटक-महाराष्ट्र सरहद्दीवर कर्नाटक पोलिसांकडून अडवणूक होत असल्याने शेतकरीवर्गात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे शेतीची कामे कशी करावी, हा प्रश्न शेतकऱयांसमोर पडला आहे. तरी पोलीस खात्याच्या वरि÷ अधिकाऱयांनी तातडीने शेतकऱयांना शेतात ये-जा करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील कर्नाटक-महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा बाची येथे चेकपोस्ट नाका आहे. सध्या कोरोना महामारीमुळे कर्नाटक-महाराष्ट्रातील नागरिकांच्या तपासणीसाठी बाची या ठिकाणी चेकपोस्ट नाका कर्नाटक पोलिसांनी उभा केला आहे. सध्या कडक लॉकडाऊन असल्यामुळे दोन्ही राज्यात ये-जा करणाऱया नागरिकांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. अत्यावश्यक बाबीसाठी तेवढेच या ठिकाणाहून सोडले जाते. मात्र, या सरहद्दीवर चंदगड तालुक्मयातील शिनोळी हा परिसर लागून येतो तर बेळगाव तालुक्मयातील बाची, तुरमुरी, कोनेवाडी, कल्लेहोळ ही गावे येतात. या गावातील अनेक शेतकऱयांची शेती महाराष्ट्र हद्दीत तर महाराष्ट्रामधील शेतकऱयांची शेती कर्नाटक हद्दीत आहे. यामुळे या शेतकऱयांना रोज या भागात ये-जा करणे अत्यावश्यक आहे. यासाठी ये-जा करण्यासाठी बेळगाव-वेंगुर्ला हाच मार्ग पर्याय आहे. याच रस्त्यावर चेकपोस्ट नाका असल्याने बेळगाव पोलिसांकडून अडवणूक केली जात आहे. यामुळे शेतकऱयांनी शेतात कसे जावे, हा प्रश्न उभा ठाकला आहे. पावसाळय़ापूर्वी शेतजमीन तयार करून भातबियाणे पेरणी करणे गरजेचे आहे. तसेच सध्या शेतात असलेला ओला चारा, भाजीपाला या सर्वांची ने-आण करणे यासाठी शेतकरीवर्गाला दोन्ही भागात ये-जा करणे गरजेचे आहे. मात्र, या ठिकाणी पोलिसांकडून अडवणूक होत असल्याने शेतकऱयांची मोठी गैरसोय होत आहे.
शेतात दुचाकीवरून ये-जा करत असताना हेल्मेटची सक्ती करण्यात येत आहे. शेतात ये-जा करताना हेल्मेट कशी घालावी, असाही प्रश्न शेतकऱयांसमोर उभा आहे. तसेच ये-जा करताना पास दाखवणे गरजेचे असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. या कर्नाटक-महाराष्ट्र सरहद्दीवर अनेक नागरिकांची राहती घरे असल्याने या घरांमध्ये या नागरिकांना ये-जा करावीच लागते. सदर ठिकाणाहून ये-जा करत असताना चेकपोस्ट नाक्मयावर विचारपूस केली जाते. प्रत्येक वेळी अडवणूक होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व अडचणींमध्ये शेतकरी अडकल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे. सदर चेकपोस्ट नाक्मयावर या भागातील शेतकऱयांची अडवणूक करू नये, अशी मागणी या भागातील सर्व शेतकरी आणि नागरिकांनी बेळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख यांच्याकडे केली आहे.