प्रतिनिधी / निपाणी :
निपाणी शहरात गुरुवारी भरणाऱया आठवडी बाजारानंतर सायंकाळी बाजार परिसरातील रस्त्यावर कचऱयाचे ढिग साचलेले असतात. त्यामुळे नागरिकांना त्रासाचे ठरत असते. याची दखल घेत पालिका आयुक्त महावीर बोरण्णावर यांनी बाजाराला शिस्त लागण्याच्या उद्देशाने गुरुवारी बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतकरी व व्यापाऱयांमध्ये जागृती करत कचरा नियोजित ठिकाणीच गोळा करण्याची सूचना कर्मचाऱयांमार्फत दिली.
निपाणीचा आठवडी बाजार मोठय़ा प्रमाणात भरत असल्याने येथे गुरुवारी शहरासह परिसरातील सुमारे 50 गावातील नागरिक या बाजारात खरेदीसाठी येत असतात. दिवसभर खरेदी-विक्री झाल्यानंतर सायंकाळी विपेते बाजारातील शिल्लक कचरा रस्त्यावरच सोडून जातात. सायंकाळी हा कचरा निपाणी पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांकडून उचलला जातो. मात्र तोपर्यंत यातील काही कचरा हा गटारींमध्ये पडल्याने गटारी तुंबतात. शिवाय परिसर अस्वच्छ राहतो.
कचरा संकलनासाठी घंटा गाडय़ा
त्यामुळे आयुक्त बोरण्णावर यांनी शहरातील छ. शिवाजी चौक, नेहरु चौक व जुना मोटार स्टँड येथे पालिकेच्यावतीने कचरा संकलनासाठी घंटा गाडय़ा थांबविल्या. विक्रेत्यांनी बाजारानंतर सायंकाळी स्वतःमुळे तयार झालेला कचरा गोळा करून तो या घंटागाडीमध्ये नेवून देण्याची सूचना करण्यात येत आहे. शिवाय प्लास्टिक बॅग बाळगणाऱया व्यापाऱयांकडून त्या जप्त करून, यापुढे प्लास्टिक पिशव्या जवळ ठेवल्यास दंड ठोठावण्याचा इशारा दिला जात आहे. यामुळे बाजारातील कचरा साठण्याचे प्रमाणदेखील कमी होऊन, पालिका कर्मचाऱयांना उर्वरित कचऱयाची उचल करणे सोपे जाणार आहे.
गुरुवारी पालिकेच्या स्वच्छता विभागातील अधिकारी विनायक जाधव, बाळू खोत यांच्या निरीक्षणाखाली विशाल मधाळे, साजन कांबळे, विक्रम कांबळे, सत्यपाल मधाळे, अतुल शिंगे, प्रणीत कांबळे, सुनील कांबळे आदींनी बाजारात फिरुन याबाबत विक्रेत्यांमध्ये जागृती केली.