प्रतिनिधी /पणजी
कोरोना महामारीमुळे अंतिम परीक्षा रद्द झालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आज सोमवार 19 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक विद्यलायांतील अंतर्गत मुल्यमापनावरून तयार करण्यात आलेला हा निकाल सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषदेत जाहीर केला जाईल. या वर्षी एकूण 18 हजार 195 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांचा आज निकाल जाहिर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या बारावीच्या लेखी परीक्षेसाठी एकूण 17 हजार 183 विद्यार्थी बसले होते. गेल्या वर्षी 89.27 टक्के निकाल लागला होता.