बेंगळूर :कोरोनाची दुसरी लाट मोठय़ा प्रमाणात फैलावल्याने राज्य सरकारने बारावी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, रिपिटर्स असणाऱयांना विद्यार्थ्यांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. परिणामी, सोमवारी न्यायालयात रिपिटर्स विद्यार्थ्यांना परीक्षेविना उत्तीर्ण करावे की नाही याबाबत सुनावणी होणार असल्याचे समजते. त्याचबरोबर प्रत्येक रिपिटर्स विद्यार्थ्याला किमान 35 टक्के गुण देण्याची शक्यता आहे. तसेच 5 ग्रेस गुण देऊन एकूण 40 गुणांसह रिपिटर्सना उत्तीर्ण करण्यात येणार असल्याचे समजते. रिपिटर्स विद्यार्थ्यांबाबत 12 जणांच्या समितीने दिलेला अहवाल राज्य सरकारने न्यायालयात सादर केला आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या हितदृष्टीने शिक्षण खात्याने 2020-21 या शैक्षणिक वर्षातील बारावीची परीक्षा रद्द केली होती. तसेच दहावी आणि अकरावीतील गुणांच्या आधारे ग्रेडनुसार बारावीचा निकाल जाहीर करण्याची घोषणाही केली होती. मात्र, यापूर्वी बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, अशी सूचना केली होती. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत रिपिटर्स विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने याबाबत स्पष्टीकरण मागितल्यानंतर सरकारने पीयु बोर्ड समितीची स्थापना केली होती. रिपिटर्स विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याबाबत सरकारही गोंधळात होते. मात्र, आता रिपिटर्सना ग्रेस मार्क देऊन उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
Previous Article…तरच भाजपविरोधी आघाडीत सामील होणार
Next Article राज्यात 1,564 नवे रुग्ण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.