बार्शी / प्रतिनिधी
बार्शी येथील बार्शी एज्युकेशन सोसायटीच्या सुलाखे हायस्कूल या शाळेमधील कार्यरत असणारे अर्धवेळ व नंतर कायम झालेले शिक्षक प्रकाश बाबुराव कांबळे यांना आपल्या नियुक्ती पासून ते आज पर्यंत म्हणजेच तब्बल अकरा वर्ष एक रुपयाही पगार मिळालेला नाही. वेळोवेळी शासनाने त्यांचा पगार काढावा असे आदेश देऊनही बार्शी येथील सुलाखे हायस्कूल चे मुख्याध्यापक यांनी जाणून बुजून त्रास देण्याच्या उद्देशाने कांबळे यांचे पगार होऊ देत नाहीत. असा गंभीर आरोप करत बार्शीतील सुलाखे हायस्कूलचे शिक्षक प्रकाश कांबळे हे आपल्या घरी 4 जून पासून आपल्या कुटुंबासमवेत आमरण उपोषणास बसले आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये नावाजलेली बार्शीतीळ सुलाखे हायस्कूल ही नेहमीच वादग्रस्त राहिलेली असून याच शाळेचे मुख्याध्यापक पाटकुलकर यांच्यावर शालेय मध्यान्ह भोजन योजनेत अपहार केल्याचे गुन्हाही नोंद झाला आहे तसेच ते आत्ता जामिनावर बाहेर आहेत आता या शाळेतील शिक्षक आपल्या कुटुंबासह आमरण उपोषणास बसल्या ने पुन्हा एकदा ही शाळा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की या शाळेत शिकवणारे प्रकाश कांबळे हे शिक्षक 15 जून 2009 पासून अर्धवेळ शिक्षक म्हणून रुजू झाले त्यानंतर त्यांचे अॅप्रोवल 2014 साली आलेले असतानासुद्धा त्यांच्या पगाराची मागणी शासनाकडे मुख्याध्यापक यांनी केली नाही. ज्या ज्या वेळी त्यांचे पगार बिल शासनाकडे पाठविण्याचे आदेश आले यावेळी मुख्याध्यापक यांनी त्यांची पगार बिले संदिग्ध किंवा शासनाकडून परत येतील अशाप्रकारे पाठवले गेले अशा प्रकारे त्रास देत जाणून-बुजून गेली अकरा वर्षे प्रकाश कांबळे यांना शाळेत कार्य करूनही कोणताच पगार किंवा मोबदला दिला गेलेला नाही. तसेच त्यांना मस्टरवर सही करण्यास ही मज्जाव केला आहे. मुख्याध्यापक अनेक प्रकारे त्रास देत असताना या शाळेने शिक्षक असूनही कांबळे यांना एका जागेवर उभे राहण्याची शिक्षा हि दिली होती ती आणि कांबळे एका जागी उभे आहेत का नाही हे पाहण्यासाठी इतर काही शिक्षकांची नियुक्ती ही मुख्याध्यापक यांनी केली होते अशी तक्रार कांबळे यांनी या अमरण उपोषण वेळी बसताना दिलेल्या निवेदनात केली आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशा प्रकारे शिक्षकांना शाळा किंवा मुख्याध्यापक जाणून-बुजून त्रास देत असतील तर गंभीर आणि चिंतेची बाब आहे यावेळी याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी मुख्याध्यापक पाटकुल कर या संस्थेचे अध्यक्ष आनंद सुलाखे यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही तर त्यांनी कोणीही घेण्याचे टाळले.