होंडा चिरेव्हाळ परिसरात बिबटय़ाचा संचार : तक्रार देऊनही वनखात्याकडून दुर्लक्ष
प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयातील होंडा पंचायत क्षेत्रातील चिरेव्हाळ गावात गेल्या काही दिवसांपासून बिबटय़ाचा संचार वाढला आहे. चार दिवसांपूर्वी येथील मराठे कुटुंबाच्या घरात अचानकपणे बिबटा घुसल्यामुळे भागांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
याबाबतची तक्रार दोन दिवसांपूर्वी वन खात्याच्या यंत्रणेला देऊनसुद्धा त्यांनी अद्याप या संदर्भात कोणतीही कारवाई न केल्याने परिसरातील नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. बिबटा घरात घुसून अशाप्रकारे दहशत माजवल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. यामुळे वनखात्याने बिबटय़ाचा बंदोबस्त करण्यासाठी ताबडतोब उपाय योजना करावी, अशी मागणी केली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून सत्तरी तालुक्मयातील अनेक गावांत रानटी जनावरे लोकवस्तीत घुसण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. बिबटय़ा रानडुक्कर, गवे यामुळे नागरिक व रानटी जनावरे यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. याबाबत सरकारने ताबडतोब लक्ष घालून याबाबत उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र त्यासंदर्भात अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. दरम्यान, चार दिवसांपूर्वी होंडा पंचायत क्षेत्रातील चिरेव्हाळ येथील मराठे कुटुंबाच्या घरांत मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घुसलेला बिबटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. यामुळे कुटुंबामध्ये भयाचे वातावरण पसरलेले आहे.
दरम्यान, या भागातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा दिवसांपूर्वी हा बिबटा अचानक लोकवस्तीमध्ये घुसून कुत्र्याचा फडशा पडला होता. चार दिवसांपूर्वी या बिबटय़ा घरात घुसल्यामुळे गावातील नागरिकांची भीती आणखी वाढलेली आहे.
मराठे कुटुंबीयांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, याबाबतची तक्रार वनखात्याला देण्यात आलेली आहे. मात्र बिबटय़ाला जेरबंद करण्याबाबत कारवाई अद्याप सुरू न केल्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.