ऑनलाईन टीम / पटना :
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या 15 नेत्यांची जनता दल (यू) पक्षाने सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये एक विद्यमान आमदार, काही माजी आमदार आणि माजी मंत्र्यांचा समावेश आहे.
दंडनसिंह यादव, रामेश्वर पासवान, भगवानसिंह कुशवाह, कांचन कुमारी गुप्ता, सुमित सिंग, रणविजय सिंह, प्रमोद सिंह सूर्यवंशी, अरुण कुमार, तजम्मूल खान, अमरेश चौधरी, शिवशंकर चौधरी, सिंधू पासवान, करतार सिंग, राकेश रंजन आणि मुंगेरी पासवान अशी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत.
दरम्यान, सोमवारी भाजपनेही बिहारमधील नऊ भाजप नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. राजेंद्र सिंग, रामेश्वर चौरसिया, उषा विद्यार्थी, रवींद्र यादव, श्वेता सिंग, इंदू कश्यप, अनिल कुमार, मृणाल शेखर, अजय प्रताप अशी भाजपातून हकालपट्टी करण्यात आलेल्या बंडखोर नेत्यांची नावे आहेत. या नेत्यांनी एनडीए उमेदवारांविरोधात अर्ज दाखल केले आहेत.