अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 26 डिसेंबर 2021 सकाळी 11.00
● जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या नियमावलीमुळे रात्रीचा सन्नाटा
● नव्याने 12 जण बाधित
● पॉझिटिव्हीटी रेट 0.82 वर
● आरोग्य विभागाकडून डॉक्टरांच्या सल्ल्याची तिसरा डोस घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
● मुक्तीचे प्रमाण कमी
सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यात नव्याने बाधित वाढ स्थिर असून रविवारी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या अहवालामध्ये 1461 जणांचे स्वॅब तपासले. 12 जण नव्याने बाधित आढळून आले. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 0.82 वर आलेला आहे. काल तिसऱ्या बूस्टर डोसची घोषणा पंतप्रधान यांनी करताच जिल्हा आरोग्य यंत्रणेने रात्रीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ज्यादाचा बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना मुक्तीचे प्रमाण कमी झाले आहे.
बूस्टर डोस कसा असेल याचीच चर्चा
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बूस्टर डोस देण्याबाबत घोषणा केली. त्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रत्येकाला बूस्टर डोस कसा असेल?, कोविशिल्ड, कोवॅक्सिन की आणखी कोणता वेगळा?, तो कसा घ्यायचा अशी उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य यंत्रणेने रात्रीच 60 वर्षावरील कोमोर्बिड लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस घ्यावा असे आवाहन केले आहे. त्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांच्याशी संपर्क साधला असता येत्या एक दोन दिवसात शासनाच्या गाईड लाईन मिळतील, अद्याप अधिकृत काही नाही, असे सांगितले.
मुक्तीचे प्रमाण घटले
जिल्ह्यातील बाधित वाढ स्थिर झालेली आहे. नव्याने बाधित वाढ ही 12 आलेली आहे. कोरोना बाधित आढळून येण्याच्या तुलनेत मुक्त होण्याचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात कोरोना मुक्तीच्या संख्येत वाढ होण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या निर्बंधामुळे रात्रीचा सन्नाटा
जिल्ह्यात अगोदरच गेली 19 महिने खूप त्रास निर्बंधामुळे झालेला आहे. अनेकांना नाहक दंडाला सामोरे जावे लागले आहे. आता नव्याने जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या नियमावलीमध्ये लग्नाला 100 ची उपस्थिती दाखवली गेली आहे, त्याच बरोबर इतर आस्थापना 50 टक्के गर्दीत सुरू ठेवण्याचा नियम घातले गेले. रात्रीचे 9 ते पहाटे 6 पर्यत एका जागी 5 जण एकत्र येऊ नये असे असल्याने दंडाची उगाच झनझट नको म्हणून रात्री सगळीकडे चिडीचूप होत आहे. मात्र,एखाद्याच्या घरात पाच हुन अधिक लोक असतील आणि ते एकत्र येत असतील तर प्रशासन काय करणार त्यामुळे ही नियमावली तशी उपयोगाची नाही.आधीच जिल्ह्यातील जनता निर्बंधाला वैतागली आहे.
रविवारी
नमुने-1461
बाधित-12
रविवारपर्यंत
नमुने-23,63,798
बाधित-2,52,318
मृत्यू-6,492
मुक्त-2,44,873