बेंगळूर/प्रतिनिधी
चामराजनगर जिल्ह्यात पोलिसांनी वन्य प्राण्याची शिकार आणि तस्करी करणाऱ्या पाच ज्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चार हरणांची शिंगे, दोन कातडे आणि दोन बंदुका जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोसेफ (४२) हा मेगाळादोड्डी गावचा रहिवासी, किरेपाती गावचा नल्ला स्वामी (३४), सुंदरहळ्ळीचा वेंकटप्पा (३८), थॉमस राज (४२) आणि जागेरीपूरचा अँथनी (३०) हे रात्री अवैधपणे जंगलात जाऊन शिकार करायचे. आरोपींनी आतापर्यंत २२ हून अधिक हरण आणि ससे यांच्यासह अनेक प्राण्यांची शिकार केली आहे.
गेल्या आठवड्यात त्यांनी वनविभागाच्या कर्मचारी रमेशवर हल्ला केला आणि अंधाराचा फायदा घेत पळून गेले. रमेशच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यांच्याकडे बंदूक जप्त केली परंतु त्याच्याकडे परवाना नाही.