बंधाऱयावरील भराव गेला घसरून : तलाव फुटण्याची शक्यता, ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष
बेळगाव / प्रतिनिधी
बेकिनकेरे गावालगतचा तलाव धोकादायक बनला असून तलावाचा बंधारा फुटण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी तातडीने पाहणी करून बंधाऱयाच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
तलाव दुरुस्तीच्या कामाकडे ग्राम पंचायतीचे साफ दुर्लक्ष झाले असून या धोकादायक तलावाच्या बंधाऱयावरून बेकिनकेरे, चलवेनहट्टी, अगसगे रस्ता गेला आहे. या रस्त्यावर शेतकरी व वाहनधारकांची सतत वर्दळ असते. बंधारा धोकादायक बनल्याने त्यावरून ये-जा करणे धोक्मयाचे बनले आहे. बंधाऱयाची सद्यस्थिती पाहता बंधारा कधी फुटेल याचा नेम नाही. बंधारा फुटला तर शेकडो एकर शेतीचे पाण्याने नुकसान होणार आहे. याकरिता आता तरी ग्राम पंचायतीने त्वरित लक्ष घालून बंधाऱयाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
तलावावरील बंधाऱयाची माती दिवसेंदिवस ढासळत असल्याने हा तलाव धोकादायक स्थितीत आहे. बंधाऱयावरील भराव घसरून रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे तातडीने संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी होत आहे. बंधाऱयावरील भराव घसरून गेल्याने केवळ तीन ते चार फूट रस्ता शिल्लक राहिला आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात वाहने घसरून तलावात पडण्याची भीती क्यक्त होत आहे. या तलावावरून अवजड वाहतूक धोक्मयाची बनली आहे.
गतवषी तलावाच्या बंधाऱयाचा भराव घसरू नये यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. मात्र ती संपूर्ण तलावाभोवती बांधण्यात आली नाही. यंदाच्या जोरदार पावसाने तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. अति पाण्याने बंधाऱयाची रुंदी कमी झाल्याने तलाव धोकादायक बनला आहे. त्यामुळे येथून ये-जा करताना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.
ग्रामस्थांतून चिंता
गावात जनावरांची संख्या अधिक असून इतरत्र पाण्याची सोय नसल्यामुळे सर्व जनावरे पाण्यासाठी या तलावावर अवलंबून आहेत. गावात पाण्याची समस्या गंभीर असल्याने महिलावर्ग याच तलावात कपडे धुतात. त्यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. त्यातच आता तलावाचा बंधारा घसरून तलाव फुटण्याचा स्थितीत असल्याने ग्रामस्थांतून चिंता व्यक्त होत आहे.