6 जणांचा मृत्यू, खानापूर तालुक्यातील तिघा जणांचा समावेश
प्रतिनिधी / बेळगाव
शनिवारी बेळगाव शहर व जिह्यातील 148 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर गेल्या 24 तासांत सहा जणांचा मृत्यू झाला असून एका खानापूर तालुक्मयातील तिघा जणांचा मृतांत समावेश आहे. कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे.
बेळगाव शहर व उपनगरातील 29 व ग्रामीण भागातील 8 असे तालुक्यातील 37 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गोकाक, मुधोळ, बेळगाव व खानापूर येथील सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी सांबरा एटीएसमधील तिघे जण व मच्छे येथील राज्य राखीव दलाच्या एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
गणेशपूर, बी. के. कंग्राळी, कंग्राळी खुर्द, उचगाव, भाग्यनगर, अंजनेयनगर, गणपत गल्ली, चन्नम्मानगर, हनुमाननगर, हिंडलगा, जाधवनगर, कडोलकर गल्ली, शहापूर, केळकरबाग, सदाशिवनगर, सह्याद्रीनगर, शिवबसवनगर, टिळकवाडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पोलीस हेडक्वॉर्टर्समधील दोघे जण व बिम्स्मधील चौघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
तर शनिवारी रात्री राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थबुलेटीनमधील माहितीनुसार शनिवारी 258 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 19 हजार 870 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्या 197 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 17 हजार 467 जण बरे झाले आहेत. 2 हजार 103 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. शनिवारी तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा सरकारी आकडा 300 वर पोहोचला आहे.