वाळपई प्रतिनिधी
होंडा पंचायत क्षेत्रातील सोलये खनिज खाणीवरून भर पावसामध्ये वाहतूक करण्याचा प्रयत्न करणाऱया कॉन्ट्रक्टरवर त्वरित कारवाई करावी त्याचप्रमाणे चौगुले खाण कंपनीने या कॉन्ट्रक्टरची हकालपट्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वाहतूक सुरूच होऊ देणार नसल्याचा इशारा ग्रामस्था?नी दिला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी चिखलमय रस्त्यावरून जात असताना या भागातील तरुणाला अपघात होऊन तो गंभीर जखमी झालेला आहे. त्यामुळे ग्रामस्था?नी शुक्रवारी संध्याकाळी वाहतूक पूर्णपणे बंद केले होती.आज शनिवारी पुन्हा सदर वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर या गावातील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले व ही वाहतूक रोखून धरली.
याबाबतची माहिती अशी की होंडा ग्रामपंचायत क्षेत्रातील सोलये याठिकाणी कार्यरत असलेल्या चौगुले खाणीवरील मालाची वाहतूक कंपनीच्या कॉन्ट्रक्टरकडून करण्यात येत आहे .सदर प्रकारची वाहतूक करण्यास ग्रामस्था?चा पूर्णपणे विरोध आहे .गेल्याअनेक वर्षापासूनच्या प्रलंबित समस्या अजूनही या कंपनीने सोडविले नाहीत .तरीसुद्धा या भागातील मालाची वाहतूक करण्याचा प्रयत्न कंपनीच्या कंत्राटदाराकडून करण्यात येत आहे.
याबाबतच्या तक्रारी व निवेदने अनेक स्तरावर सत्तरी तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकारी ,मामलेदार, वाळपई पोलिस , गोवा राज्याचे मुख्यमंत्री खाण संचनालाय यांना पाठविण्यात आलेले आहेत .मात्र याबाबत अजूनही कोणत्या प्रकारची हालचाल न झाल्यामुळे नागरिकांत तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भर पावसात वाहतूक नागरिकांत संताप.
एका बाजूने कोरोनाची महामारी व दुसऱया बाजूने प्रचंड प्रमाणात पाऊस या dभ्गांमध्ये लागत आहे. असे असताना भर पावसामध्ये यावाहतुकीला प्रारंभ झालेला आहे. यामुळे नागरिक सरकारच्या नावाने प्रचंड असंतोष व्यक्त करीत आहेत. सध्याही वाहतूक सुरू असल्यामुळे रस्त्यावर पूर्णपणे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे .रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी अनेकवेळा करून सुद्धा त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे याभागातील ग्रामस्थ व कंपनीच्या व्यवस्थापध दरम्यात तीव्र स्वरूपाचा संघर्ष निर्माण झालेला आहे. मात्र कंपनीचे व्यवस्थापन सरकारच्या संबंधित यंत्रणेला हाताशी धरून जबरदस्तीने ही वाहतूक करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे सरकारला या भागातील जनतेचे व ग्रामस्था?चे काहीही पडलेलं नसल्याचा आरोप ग्रामस्थ करताना दिसत आहेत.
शुक्रवारी अपघातामुळे आंदोलन चिघळले.
दरम्यान शुक्रवारी सदर गावातील एक तरुण होंडाच्या भागाने जात असताना चिखलमय रस्त्यावर तो निसटून पडला व त्यांला जबर जखम झाली.असे असताना या कंपनीच्या कॉन्ट्रक्टरकडून या प्रकाराची कोणतीही गंभीर दखल न घेत आज सकाळी वाहतुकीला प्रारंभ झाला. यामुळे शुक्रवारी संध्याकाळी या भागातील ग्रामस्थाने ही वाहतूक रोखून धरली होती. आज सकाळी सदर वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरले व ही वाहतूक पूर्णपणे रोखून धरली.
मामलेदार, पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल.
याबाबतची माहिती मिळताच सत्तरी तालुक्मयाचे मामलेदार ईशांत सावंत वाळपई पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्रामस्?थासोबत झालेल्या चर्चेत अनेक विषयावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. मात्र भागातील ग्रामस्था?नी जोपर्यंत कॉन्ट्रक्टरची हकालपट्टी होत नाही व ग्रामस्था?च्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत वाहतूक कोणत्याही परिस्थितीत सुरू करून नसल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे.
यासर्व समस्या कॉन्ट्रक्टरच्या हेकेखोर वृत्तीमुळेच सुरू झाल्या असून या कॉन्ट्रक्टरची हाकालपट्टी कंपनीने करावी अशा प्रकारची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
यामुळे मालाने भरून ठेवलेले ट्रक मोठय़ा प्रमाणात तैनात करण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्तात सोडून देण्यात आले व त्यानंतर ही वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.
दरम्यान या भागातील नागरिक आनंद गावडे यांनी कॉन्ट्रक्टरची हकालपट्टी करावीच लागेल अशा प्रकारचा पुनरुच्चार केला..
सोमवारी सबंधित यंत्रणेकडून होणार खाणींची पाहणी.
दरम्यान गावातील नागरिकांनी संबंधित यंत्रणेला यासंदर्भात तक्रारी व निवेदने सादर करण्यात आल्यानंतर त्याची दखल घेण्यात आलेली आहे. ा बाजूने मोठय़ा प्रमाणात पडणारा पाऊस व दुसऱया बाजूने खाणीवरून खनिज मालाची होणारी वाहतूक या पार्श्?वभूमीवर खाणीची सुरक्षितता व या संदर्भात कोणत्या प्रकारची उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत यासंदर्भाची पाहणी करण्यासाठी सोमवारी सकाळी 11.30 वाजता संबंधित खात्याचे प्रतिनिधी या भागांमध्ये भेट देणार आहेत. यावेळी खाणीच्या सुरक्षिततेसंदर्भाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे एकूण मिळालेल्या माहितीनुसार समजते. तोपर्यंत ही वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याचे अधिकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.