जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
भाग्यनगर येथील खुल्या जागेमध्ये मुस्लीम स्मशानभूमी आहे. मात्र ही जागा एक जण स्वतःच्या नावावर करून घेत असून ती सर्व जागा स्मशानभूमीसाठी राखीव ठेवावी, अशी मागणी अनगोळ येथील मुस्लीम जमात यांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भाग्यनगर येथील सातव्या क्रॉसजवळ असलेली सर्व्हे क्र. 47/4 ही स्मशानभूमी म्हणून नेंद होती. मात्र, आता सीटीएस उताऱयावर दुसऱयाच व्यक्तीचे नाव येत आहे. तेव्हा या प्रकरणाची चौकशी करून ती जागा स्मशानभूमीसाठी राखीव ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कुरुंदवाड सरकारने 1814 मध्ये ती जागा मुस्लीम समाजासाठी दिली आहे. याबाबतची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. मात्र, आता सीटीएस उताऱयावर नाव बदलले जात आहे. तेव्हा ती संपूर्ण जागा स्मशानभूमीसाठी राखीव ठेवावी, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी मुस्लीम समाजातील नागरिक उपस्थित होते.