प्रतिनिधी/ पणजी
देशातील शेतकऱयांनी जे आंदोलन सुरु केले आहे आणि जो भारत बंद पुकारलेला आहे त्याला आम आदमी पक्षाचा पूर्ण पाठिंबा असणार आहे. अनेक शेतकरी दिल्लीच्या सिमेवर येऊन ठांबले आहे. अशावेळी अरविंद केजरीवाल व आपचे कार्यकर्ते त्यांना अन्न, राहण्याची सोय, आरोग्य पुरवत आहे. हे पाहून अमित शहा यांनी अरविंद केजरीवाल यांना नजरकैद करण्यात आले आहे. त्यांच्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो. असे आपचे गोवा निमंत्रक राहूल म्हांबरे यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.
हे कृषी विधेयक पूर्णपणे शेतकऱयांच्या हिताविरुध्द आहे. हे विधेयक मंजुर करताना संसदेत चर्चा होणे आवश्यक होती, परंतु असे न करता घाईघडबडीत एकाच दिवसात हे विधेयक मंजुर करण्यात आले. आतापर्यंत चर्चेच्या पाच फेऱया होऊनही त्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. दिल्ली पोलिसांचे नियंत्रण भाजपच्या हातात असताना दिल्ली सरकारवर दबाव आणून शहराच्या स्टेडियमचा तात्पुरत्या कारागृहासारखा वापर करून शेतकऱयांना बंदी बनवण्यासाठी दिल्ली सरकारवर दबाव आणणे सुरू होते. परंतु केजरीवाल सरकारने स्टेडियम्सचा गैरवापर करायला दिला नाही. आणि याचाच राग केजरीवाल यांना नजरकैद ठेऊन काढण्यात आला. असे म्हांबरे यांनी पुढे सांगितले.
सध्या भाजप सरकारने अघोषित आणिबाणी लागु केले आहे. येथे कुणीही सरकारविरुध्द, अन्यायाविरुध्द बोलायला लागले की त्यांना देशद्रोही करुन जेलमध्ये घातले जाते. ही एकाप्रकारची हुकुमशाही असून या गोष्टीचा आम्ही कडक शब्दात निषेध करतो. असे म्हांबरे यांनी पुढे सांगितले.