राजकारणात कधी कशी बाजी पलटेल हे सांगता येत नसते. म्हातारी मेल्याचे दुःख नसते, पण काळ सोकावत असतो. जगातील सर्वात मोठा पक्ष असा दावा करणारा भाजप नाजूक काळातून जात आहे हे खरे.
भाजपचे लक्षण काही ठीक नाही. भाजपमध्ये बोलघेवडय़ांची कमी नाही. पण तरीही त्या पक्षात एक भीषण शांतता पसरली आहे. ही केवळ बोलकी शांतता आहे असे नाही. ती जीवघेणी शांतता आहे. इतना सन्नाटा क्मयूं हैं भाई। असे म्हणण्याइतपत शांतता आहे. खरोखरच स्मशान शांतता आहे. तीन महिन्यापूर्वी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱयांच्या बैठकीत कोरोना महामारीला पराभूत केले म्हणून एका ठरावाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जाहीर अभिनंदन केले गेले होते. पण आता हा ठराव फार लवकरच झाला असे दिसत आहे. कारण आत्तापर्यंत किमान तीन लाख लोक यात मृत झाल्याचे बोलले जात आहे. मोदींना खुश करण्याच्या नादात सत्ताधारी पक्षच तोंडघशी पडला असे साफ दिसत आहे. या महामारीने एकीकडे देशात प्रेतांचा खच वाढतोय आणि त्यांची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न आ वासून उभा आहे. भाजपशासित राज्यांमध्ये मग ते गुजरात असो की मध्य प्रदेश वा उत्तर प्रदेश अथवा कर्नाटक, तिथे रामराज्य आहे असे अजिबात नाही. सत्ताधाऱयांचा ग्राफ अतिशय खाली घसरत आहे. केंद्रात आणि राज्यातही. गैरभाजप राज्यातदेखील काहीसे असेच चित्र आहे. केंद्र आणि बऱयाच राज्यात भाजपचीच सरकारे असल्याने त्यांच्यापुढेच यक्षप्रश्न पडणार हे दिसत आहे. एकीकडे पंतप्रधान जास्त भावुक होत आहेत असे चित्र आहे तर दुसरीकडे गृहमंत्री फारसे दिसतच नाहीत अशी तक्रार आहे. काहीतरी खरेच बिघडले आहे असे सामान्य माणसाला जाणवत आहे.
अमेरिकेच्या ‘मॉर्निंग कॉन्सुलट’ च्या एका चाचणीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमध्ये तब्बल 22 टक्क्मयांची घट झाली आहे. एका राष्ट्रीय वर्तमानपत्राने आपल्या ऑनलाईन एडिशनमध्ये ‘मॉर्निंग कॉन्सुलट’ ची बातमी दिली आणि थोडय़ा वेळाने ती काढून टाकली. अमेरिकेच्या ‘कॉर्न्वर्सशन’ नावाच्या प्रसार माध्यमावर जगात सर्वात वाईट रीतीने कोणा राज्यकर्त्याने कोरोना हाताळला अशी एक चाचणी घेण्यात आली. त्यात मोदींना 90 टक्के मते पडून ते पहिले आले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्राझीलचे नेते बोल्सनरो आणि मेक्सिकोचे अध्यक्ष उरलेल्या 10 टक्क्यात गुंडाळले गेले. मोदींची जगात झालेली नाचक्की देशातील प्रसारमाध्यमांमध्ये मात्र बरीच झाकून ठेवली गेली. पण कोंबडे झाकले म्हणून उजाडायचे थोडेच राहणार?
आत्तापर्यंत विरोधी पक्षांच्या, विशेषतः काँग्रेसच्या नावाने खडे फोडत त्यांच्यावर देशाची बदनामी करण्याचा वारंवार आरोप करण्याच्या उद्योगाला लागलेल्या भाजपला हळूहळू आपल्या पायाखाली काय जळत आहे हे कळू लागलेले दिसत आहे. मोदी सरकार सात वर्षे पूर्ण करत आहे त्या निमित्ताने येत्या 30 तारखेला भाजप एक अभियान सुरू करत आहे. महामारीने अनाथ झालेल्या मुलांशी जोडण्याचे निमित्त करत आता डॅमेज कंट्रोलला सुरुवात करण्याचे काम होणार आहे. साऱया देशावर एवढे मोठे संकट आले असताना भाजप कार्यकर्ता कोठे फारसा दिसलाच नाही याची जाणीव सत्ताधाऱयांना होऊ लागली आहे. लसींच्या अभावी लसीकरण प्रक्रियेचेच बारा वाजल्याने त्याचे पातक साहजिकच केंद्राच्या डोक्मयावर फोडले जात आहे. डॅमेज कंट्रोल सोपे काम नाही. सरकार आणि पक्षात ‘सब कुछ मोदी-शहा’ असल्याने पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्यासह सारेच दुय्यम आहेत, बनवले गेले आहेत. गेल्या आठवडय़ातच ज्ये÷ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी-शहा कोणाला विश्वासात घेत नाहीत हे कोणताही वाद न करता पण चपखलपणे सांगितले आहे. लसीकरणाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी राज्याराज्यांमध्ये वेगवेगळय़ा कंपन्यांना लस बनवण्याची परवानगी द्यायला पाहिजे असे गडकरींनी सांगितले होते. यानंतर एकाच दिवसात त्यांनी असा निर्णय सरकारने अगोदरच घेतलेला आहे पण त्याची आपणाला अजिबात माहिती नव्हती असे स्पष्टीकरण समाज माध्यमावर देऊन आपणासदेखील काही सांगितले जात नाही असेच सुचवले आहे. जर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेल्या गडकरींची ही अवस्था तर इतरांचे विचारायलाच नको. दुसरे एक ज्ये÷ मंत्री राजनाथसिंग हे आपले काम बरे आणि आपण बरे असे वागून मोदी-शहाबरोबर आपले मार्क वाढवत असतात अशी पक्षात कुजबुज असते. सध्या राजनाथ खुश आहेत कारण उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्यांना बाजूला टाकलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राज्यात पसरलेल्या महामारीने बेजार झालेले आहेत. उत्तरेतील ठाकुरांबाबत कधी काही सांगता येत नाही. ते बेभरवशाचे असतात असे बोलले जाते. विश्वनाथ प्रताप सिंगानी राजीव गांधींविरुद्ध बोफोर्स भडकवले आणि त्यातून तीन दशके उलटली तरी काँग्रेसला अजूनही उठता आलेले नाही. आपल्या भाषणातून, बोलण्यातून, वक्तव्यातून, कृतीतून भाजपला देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी आणले आहे हे निर्विवाद. राहुल गांधींना ‘पप्पू’ म्हणून हिणवून मोदी भक्तांना हे सहजसाध्य झाले हा इतिहास झाला, म्हटले तर ताजा, म्हटले तर शिळा. ज्याची त्याची बघण्याची दृष्टी. एक आठवडय़ात कधीकधी सगळे राजकारण बदलते. येथे सात वर्षे झाली आहेत आणि कितीही बाता मारल्या असल्या तरी जमिनीस्तरावर फारसे काहीच घडलेले नाही. मोदींच्या राज्यकारभाराने सामान्य माणसाला एकप्रकारे ‘आत्मनिर्भर’ बनायला शिकवले आहे असे कडवटपणे त्यांचे विरोधक म्हणत आहेत. याला कारण या महामारीत जीव वाचवायला प्राणवायू पाहिजे असेल तर किंवा कोणती महत्त्वाची औषधे अथवा रुग्णालयात प्रवेश, या साऱया बाबतीत सरकारने एक प्रकारे हातच खडे केल्याने प्रत्येकाला आत्मनिर्भर बनून स्वतःलाच वाचवावे लागले आणि ज्याला तसे करता आले नाही तो अक्षरशः मेला असे राजधानी दिल्लीत देखील बऱयाच वेळा पहायला मिळाले आहे.
अशातच ‘टूलकिट’ वादाने सत्ताधाऱयांना घेरले आहे. संबित पात्रा यांच्यासारख्या भाजप प्रवक्त्यांची टकळी अजून चालूच आहे. अमित मालवीय हे भाजपच्या आई टी सेलचे मुख्य आहेत. ते देखील त्यांचे वाग्बाण सारखे चालवत असतात. पण कशाचाच काही उपयोग होत नाही असे दिसत आहे. इतके दिवस ममतादीदींच्या मागे हात धुवून लागलेल्या भाजपला आता बंगालमधील आपले आमदार त्या फोडतील काय या भयाने पछाडले आहे. राजकारणात कधी कशी बाजी पलटेल हे सांगता येत नसते. म्हातारी मेल्याचे दुःख नसते, पण काळ सोकावत असतो. जगातील सर्वात मोठा पक्ष असा दावा करणारा भाजप नाजूक काळातून जात आहे हे खरे.
सुनील गाताडे