बेंगळूर/प्रतिनिधी
जनता दल-एसचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी विधानपरिषदेतील सत्ताधारी भाजपबरोबरची युती फक्त सभापतींच्या निवडीपुरतीच मर्यादित असेल.रामनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जेडी-एसची युती भाजपशी फक्त अध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत आहे आणि जेडी-एस अन्य कोणत्याही मुद्दय़ावर भाजपबरोबर नाही. जेडी-एस लोकविरोधी मुद्द्यांना समर्थन देणार नाही, असे ते म्हणाले.
विशेष म्हणजे उपसभापती निवडणुकीत जद-एसने भाजपला पाठिंबा दर्शविला होता आणि आता भाजपने सभापतीपदाच्या निवडणुकीत जद-एसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना परिस्थिती बिघडण्यापूर्वी याची काळजी घेण्यास सांगितले. कुमारस्वामी यांनी पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचा आदर केला तर केंद्रीय कृषिमंत्र्याऐवजी त्यांनी स्वतः शेतकर्यांशी बैठक घेऊन संबंधित प्रश्न सोडवावा, असे स्पष्ट केले आहे.