ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बिहार विधानसभा निवडणुकीत बहुमत सिद्ध केल्यानंतर भाजप आता पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखत आहे. पक्षातीतील सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
पश्चिम बंगालमध्ये सध्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे सरकार आहे. बिहारमध्ये विजयाची खात्री केल्यानंतर आता राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या बंगालवर भाजपचा भर आहे. पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 294 पैकी 200 हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे.
दरम्यान, बिहारमधील 243 विधानसभा मतदारसंघाच्या निकालात एनडीएने 125 जागा जिंकल्या. त्यामधील 74 जागांवर विजय मिळवून भाजप बिहारमधील दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जदयूला केवळ 43 जागांवर विजय मिळाला.