पणजी : आज गोव्यात गुन्हेगारी कारवाया दिवसेंदिवस वाढत असुन, लोकांच्या मनात भयाचे वातावरण आहे. राज्यात आज प्रत्येक दिवशी बलात्कार, अपहरण, टोळी युद्ध सारख्या घटना घडत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गोव्याला “गुन्हेगारांचे स्थळ” बनविले आहे. त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नसुन, राज्यपालांनी सरकार त्वरित बरखास्त करावे अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांना भेटुन केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा, काँग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. शेख व संकल्प आमोणकर यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्ले यांची राजभवनांवर भेट घेवुन त्यांना निवेदन सादर करुन भाजप सरकार बरखास्तीची मागणी केली.
राज्यात कोसळलेल्या कायदा व सुव्यवस्थेची राज्यपालांनी त्वरित दखल घ्यावी व सरकार बरखास्त करुन लोकांना दिलासा द्यावा असे काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले.
आपले कर्तव्य बजावणार्?या एका डॉक्टरवर हल्ला होतो व हल्लेखोरांना अटक करण्यास सरकार टाळाटाळ करते यावरुन राज्यात कोणाचाही वचक नसल्याचे स्पष्ट होते. आज समाजकंटक कायदा हातात घेवुन लोकांमध्ये दहशत माजवीत आहेत असे दिगंबर कामत म्हणाले.
गोमंतकीय आज भयाच्या वातावरणात राहत असुन, लोकांना सुरक्षा देण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसचे कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा यांनी केला.
आज राज्यपालांना सादर केलेल्या चार पानी निवेदनात कळंगुट येथे 12 ऑगस्ट रोजी सापडलेल्या सिद्धी नाईक हिच्या मृत्युचे कारण शोधण्यास पोलीसांना अद्याप यश आलेले नाही तसेच दोन दिवसांपुर्वी एका वडिलानेच आपल्या सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना, फोंडा येथे एका युवतीचे अपहरण करण्याचा प्रयत्न या घटनांवरुन गुन्हेगारांना पोलीसांचे भय नसल्याचे उघड होत आहे तसेच आज गुन्हेगांराना गोवा हे सुरक्षित स्थळ वाटत आहे असे नमुद करण्यात आले आहे.
भाजप सरकारने गोव्यातील गुन्हेगारी कारवायांना आळाबंद आणण्यासाठी काहीच केलेले नाही. भाजपने ड्रग माफीया, गुन्हेगार माफीया व भिकारी माफीयांना प्रोत्साहन दिले असुन, त्यामुळेच शांतताप्रेमी गोव्याचे नाव बदनाम झाले आहे. 21 जून 2020 रोजी झालेल्या सांताप्रुझ गॅ?ग वॉर पासुन कालच समाजमाध्यमांवर झळकलेल्या पोलीस कॉस्टे?बलकडुन आपल्या बायकोला झालेल्या मारहाणीच्या घटनांचा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे.
डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचाही या निवेदनात उल्लेख करण्यात आला असुन, सरकारने हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मागील तीन महिन्यात गोव्यात गुन्हेगारी कारवायांत प्रचंड वाढ झाली आहे. कळंगुट येथे सापडलेली सिद्धी नाईक हिचा मृतदेह व सदर प्रकरणाचा गुंता सोडविण्यास पोलीसांना आलेले अपयश यावर राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
बाणावली येथे दोन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी पालकांना दोष दिला होता. आता उत्तर गोव्यात झालेले संशयास्पद मृत्यू, बलात्कार घटना, अपहरणाचे प्रयत्न यावरुन मुख्यमंत्री कोणाला गप्प आहेत असे सदर निवेदनात म्हटले आहे.