सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले
@ प्रतिनिधी/ बेळगाव
पेट्रोल, डिझेल आदी इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. त्यापाठोपाठ गॅसच्या किमतीदेखील वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईच्या दणक्मयात होरपळून जाणाऱया जनतेला वाढत्या भाजीपाल्यांचादेखील चटका सहन करावा लागत आहे. भाजीपाल्यांच्या किमती हाताबाहेर गेल्याने भाजीपाला खरेदी करणे कठीण झाले आहे. विशेषतः बिन्स, फ्लॉवर, टोमॅटो, ढबू, गवार, वांगी, भेंडी, कोबी, दोडकी आदी भाजीपाल्यांच्या दरात भरमसाट वाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेला काय खावं आणि कसं जगावं? असा प्रश्न पडला आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात गाजर 50 रुपये किलो, फ्लॉवर 30 ते 40 रु. एक, बिन्स 80 रु. किलो, शेवग्याच्या शेंगा 40 रु. पेंढी, हिरवा वाटाणा 80 रु. किलो, ढबू 100 रु. किलो, टोमॅटो 80 रु. किलो, मुळा 20 रु. चार, वांगी 120 रु. किलो, गवार 100 रु. किलो, कारली 100 रु. किलो, कोबी 50 रु. एक, सोले 120 रु. शेर, कोथिंबीर 10 रु. पेंढी, कांदापात 20 रु. तीन, लालभाजी 20 रु. एक, पालक 10 रु. एक, मेथी 20 रु. एक, दुधी भोपळा 40 रु. एक, भेंडी 120 रु. किलो, दोडकी 100 रु. किलो, काकडी 100 रु. किलो, लिंबू 10 रु. आठ नग याप्रमाणे विक्री सुरू होती.
मागील महिन्याभरापासून भाजीपाल्यांच्या दरात वाढ होत आहे. एरवी 30 ते 40 रुपयांना मिळणारी वांगी 150 रु. किलो झाली आहेत. त्यामुळे वांग्याच्या दराने डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. वांग्याचा दर जवळजवळ चिकनच्या दराएवढा झाल्याने ‘वांगी नको रे बाबा’ म्हणण्याची वेळ गृहिणींवर आली आहे. याबरोबरच इतर सर्वच भाजीपाल्यांचे दर किलोमागे 80 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
कडधान्य व अंडय़ांना पसंती
भाजीपाल्यांचा दरात भरमसाट वाढ झाल्याने ग्राहक कडधान्य व अंडय़ांना पसंती देत आहेत. सर्रास भाजीपाल्यांचे दर 80 रुपयांपुढे गेल्याने सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे कठीण झाले आहे. त्यामुळे वेळ मारून नेण्यासाठी कडधान्य व अंडी खरेदी करताना ग्राहक दिसत आहेत.
अवकाळीचा फटका
मागील महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने भाजीपाला मोठय़ाप्रमाणात खराब झाला आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक मंदावली आहे. त्यामुळे भाजी उपलब्ध होत नसल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. एरवी 20 ते 30 रुपये किलो दराने मिळणारा भाजीपाला 80 ते 100 रुपये झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला नको म्हणण्याची वेळ आली आहे..