खाद्यतेलांच्या दरात घसरण, फळांनाही पसंती
प्रतिनिधी/ बेळगाव
उन्हाळ्याला प्रारंभ झाल्याने पालेभाज्यांना मागणी वाढू लागली आहे. भाजीपाल्यांचे दर स्थिर असून विशेषत: मेथी, कांदापात, पालक, काकडी, गाजर आदींना पसंती दिली जात आहे. गाजर, काकडी, ढब्बू, गवार, दोडकी, कारली आदी भाज्या वगळता इतर भाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत.
शनिवारच्या आठवडी बाजारात फ्लॉवर 10 ऊ., बटाटा 30ऊ. किलो, कांदे 25 ऊ. किलो, काकडी 50 ऊ. किलो, ढब्बू 50 ऊ. किलो, गाजर 50 ऊ. किलो, बीन्स 50 ऊ. किलो, ओली मिरची 50 ऊ. किलो, वांगी 30 ऊ. किलो, कोबी 10 ऊ. एक, गवार 60 ऊ. किलो, कारली 60 ऊ.किलो, दोडकी 60 ऊ. किलो, टोमॅटो 25 ऊ. किलो, भेंडी 60 ऊ. किलो, कांदापात 20 ऊपयाला 4 ते 5 पेंड्या, मेथी 20 ऊ. 4 पेंड्या, लाल भाजी 20 ऊ. 4 पेंड्या, पालक 20 ऊ. 4 ते 5 पेंड्या, कोथिंबीर 10 ऊ. पेंडी, शेवग्याच्या शेंगा 10 ऊ. पेंडी असा दर आहे.
शिवरात्रीपासून उष्मा वाढू लागला आहे. त्यामुळे थंड पेय, फळे आणि पालेभाज्यांना मागणी वाढू लागली आहे. त्याचबरोबर बाजारात कलिंगड, द्राक्षे, अननस, संत्री, मोसंबी, सफरचंद, लिंबूंची खरेदी वाढली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. याशिवाय लग्नसराई आणि इतर धार्मिक कार्यक्रम वाढले आहेत. त्यामुळे बाजारात खरेदीदेखील वाढू लागली आहे.
खाद्यतेलाचे दर मागील पंधरा दिवसात किलोमागे 10 ते 15 ऊपये कमी झाले आहेत. प्रतिकिलो तेलाचे भाव सोयाबीन तेल 130 ऊ., सनफ्लॉवर 150 ऊ., पामतेल 120 ऊपये आहे. 15 किलो डब्यामागे 300 ऊपयांनी भाव कमी झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे..